शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच केंद्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:12 IST

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी संवेदनशील भागात एकूण पाच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत ...

ठळक मुद्देदहावीकरिता तीन केंद्र संवेदनशील : बारावीच्या १६ हजार ७११ विद्यार्थ्यांची २१ पासून कसोटी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी संवेदनशील भागात एकूण पाच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना परीक्षेबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.इयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), डायटचे प्राचार्य यांचे एक व महिलांच्या एक स्वतंत्र पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या परीक्षेसाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.यावर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून पाच नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या नव्या परीक्षा केंद्रांमध्ये भगवंतराव ज्युनिअर कॉलेज सिरोंचा, किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड, देशबंधू चित्तरंजनदास येनापूर, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय पोटेगाव व भगवंतराव ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आदी केंद्रांचा समावेश आहे.इयत्ता बारावीसाठी संवेदनशील भागात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, श्री साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती कनिष्ठ महाविद्यालय अंगारा, भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय गट्टा व संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय बामणी आदींचा समावेश आहे.१ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्र संवेदनशील भागात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, भगवंतराव आश्रमशाळा बुर्गी, साईनाथ विद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती विद्यालय अंगारा, पांडव हायस्कूल येंगलखेडा, विदर्भ विद्यालय पोटेगाव, श्रीनिवास हायस्कूल अंकिसा, भगवंतराव हायस्कूल टेकडाताला, धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी, भगवंतराव आश्रमशाळा गट्टा, शासकीय आश्रमशाळा ताडगाव व शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा आदी केंद्रांचा समावेश आहे. इतर ठिकाणचे केंद्र सर्व साधारण आहेत.त्या केंद्रांवर जिल्हाधिकाºयांचे पथक धडकणारइयत्ता बारावीच्या परीक्षेवर जिल्हाधिकारी शेखर सिंह हे विशेष लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील एकाही परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी महसूल विभागाचे पथक गठीत करण्यात आले आहे. यामध्ये नायब तहसीलदार व महसूल निरिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी राहणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपी सारखा गैरप्रकार चालतो, अशा केंद्रांवर जिल्हाधिकारी सिंह हे स्वत: भेट देणार असल्याची माहिती आहे. कॉपी बहाद्दरांवर मंडळ नियमावलीनुसार कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व पथकांना दिले आहेत. या परीक्षेत नियुक्त केलेले परीरक्षक बदलणार आहेत. केंद्रावर प्रत्येक दिवशी नवा परीरक्षक राहणार आहे.