शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच केंद्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:12 IST

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी संवेदनशील भागात एकूण पाच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत ...

ठळक मुद्देदहावीकरिता तीन केंद्र संवेदनशील : बारावीच्या १६ हजार ७११ विद्यार्थ्यांची २१ पासून कसोटी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी संवेदनशील भागात एकूण पाच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना परीक्षेबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.इयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), डायटचे प्राचार्य यांचे एक व महिलांच्या एक स्वतंत्र पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या परीक्षेसाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.यावर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून पाच नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या नव्या परीक्षा केंद्रांमध्ये भगवंतराव ज्युनिअर कॉलेज सिरोंचा, किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड, देशबंधू चित्तरंजनदास येनापूर, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय पोटेगाव व भगवंतराव ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आदी केंद्रांचा समावेश आहे.इयत्ता बारावीसाठी संवेदनशील भागात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, श्री साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती कनिष्ठ महाविद्यालय अंगारा, भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय गट्टा व संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय बामणी आदींचा समावेश आहे.१ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्र संवेदनशील भागात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, भगवंतराव आश्रमशाळा बुर्गी, साईनाथ विद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती विद्यालय अंगारा, पांडव हायस्कूल येंगलखेडा, विदर्भ विद्यालय पोटेगाव, श्रीनिवास हायस्कूल अंकिसा, भगवंतराव हायस्कूल टेकडाताला, धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी, भगवंतराव आश्रमशाळा गट्टा, शासकीय आश्रमशाळा ताडगाव व शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा आदी केंद्रांचा समावेश आहे. इतर ठिकाणचे केंद्र सर्व साधारण आहेत.त्या केंद्रांवर जिल्हाधिकाºयांचे पथक धडकणारइयत्ता बारावीच्या परीक्षेवर जिल्हाधिकारी शेखर सिंह हे विशेष लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील एकाही परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी महसूल विभागाचे पथक गठीत करण्यात आले आहे. यामध्ये नायब तहसीलदार व महसूल निरिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी राहणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपी सारखा गैरप्रकार चालतो, अशा केंद्रांवर जिल्हाधिकारी सिंह हे स्वत: भेट देणार असल्याची माहिती आहे. कॉपी बहाद्दरांवर मंडळ नियमावलीनुसार कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व पथकांना दिले आहेत. या परीक्षेत नियुक्त केलेले परीरक्षक बदलणार आहेत. केंद्रावर प्रत्येक दिवशी नवा परीरक्षक राहणार आहे.