शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाचव्या दिवशीही धुवाधार... घरे, दुकानात पाणी; सर्वत्र दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:19 IST

ढगांचा गडगडाट : आज रेड अलर्टचा इशारा; २३ रस्ते जलमय; दळणवळण ठप्प

गडचिरोली : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. धुवाधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दरम्यान, जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. तब्बल २३ रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावे संपर्काबाहेर गेली असून, दळणवळण ठप्प झाले आहे. शनिवारी (दि. २२) रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

आज पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद

पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहेत. या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे २० जुलै रोजीच शाळा, अंगणवाड्या व महाविद्यालये बंद ठेवली होती.

पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामूलगौतम, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मीणा यांनी २२ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

भामरागडमध्ये पुन्हा अनेक गावांना पाण्याचा वेढा

भामरागड तालुक्यात २० जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यावर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे २१ जुलैला अनेक गावांचा संपर्क तुटला. सलग चार दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. पर्लकोटा नदीचे पाणी ओसरल्यानंतर २० जुलै रोजी वाहतूक पूर्ववत सुरु झाली. मात्र, विजेअभावी पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल झाले. रात्री पावणेआठ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला, पण नेटवर्क अद्यापही गायब आहे. त्यामुळे संपर्क होण्यास मोठ्या अडचणी येत आहेत.

रात्री वीजपुरवठा सुरू झाला. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच भटकंती करावी लागली. कुडकेली, पेरमिली, चंद्रगाव जवळील नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड ते आलापल्ली वाहतूक ठप्प झाली. भामरागड, लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी (गुंडेनूर नाला), नेलगुंडा परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

हे रस्ते गेले पाण्याखाली

सिडकोंडा -झिंगानूर, कोत्तापल्ली र. - पोचमपल्ली, आसरली- मुतापूर- सोमनूर मौ शीखांब - अमिर्झा, साखरा - चुरचुरा, कुंभी - चांदाळा, रानमूल - माडेमूल, आलापल्ली- सिरोंचा, कान्होली - बोरी-गणपूर, चामोर्शी- कळमगाव, चांभार्डा- अमिर्झा, हरणघाट-चामोर्शी, तळोधी-आमगाव-एटापल्ली, कोनसरी-जामगिरी, आलापल्ली -भामरागड, चामोर्शी-आष्टी, कोपरअल्ली- मुलचेरा, अहेरी- मोयाबिनपेठा-वटरा, चामोर्शी - हरणघाट, कोनसरी जामगिरी, सावेला - कोसमघाट- रायपूर, राजोली -मारदा, पोटेगाव ते राजोली हे रस्ते २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाण्याखाली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे.

दुर्गम भागात नेटवर्क गायब

जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती असून, यापैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये अजूनपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये विविध दाखल्यांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी ग्रा.पं.चेही कामकाज प्रभावित होत आहे.

एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून शासकीय योजना पोहोचवण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम 'भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे..

सध्या शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, ग्रा.पं. कडून देण्यात येणारे ऑनलाइन दाखले इंटरनेट अभावी मिळण्यास अडचण होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने 'लक्ष देऊन ग्रामीण व दुर्गम भागातील ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसGadchiroliगडचिरोली