दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी झटताहेत आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:37+5:30
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाºया घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग्य विभागाकडून केली जात असलेली जनजागृती महत्वाची ठरली आहे.

दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी झटताहेत आरोग्य कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे एकीकडे बहुतांश सरकारी कर्मचारी घरात आराम करत आहेत. मात्र आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अग्रणी राहून दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी अविरतपणे झटत आहेत. संशयित रुग्णांवर उपचार करण्यासोबतच संसर्गापासून स्वत:चा कसा बचाव करावा याबाबत शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात जागृती करत आहेत. एवढेच नाही तर इतर आजारांसाठीही अविरतपणे रुग्णसेवा करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाऱ्या घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग्य विभागाकडून केली जात असलेली जनजागृती महत्वाची ठरली आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यास परिस्थिती सांभाळणे कठीण होईल, ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला आहे. आशा वर्कर, परिचारिका, डॉक्टर, आरोग्य विभागातील अधिकारी यांनी सर्वांनी स्वत:ला जनजागृतीच्या मोहिमेत झोकून दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा कसा बचाव करावा, या विषयी जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळेच दुसºया जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती गावातील नागरिक आरोग्य व पोलीस विभागाला देत आहेत. तसेच संबंधित व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवत आहेत. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
एखाद्या कामासाठी जाताना अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात आहे. पुणे, मुंबईतील नागरिकांना जे जमले नाही ते येथील नागरिक करून दाखवित आहेत. त्यामुळेच गडचिरोली जिल्हा अजुनही कोरोनामुक्त राहिला आहे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवले जाते. या नागरिकांची नियमित तपासणी करणे, एखादा संशयीत रूग्ण आढल्यास त्याला तत्काळ गडचिरोली येथे पाठविणे आदी कामे केली जात आहेत.
कमी कर्मचारी असतानाही उत्तम काम
गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टरांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य कर्मचाºयांचीही जवळपास २५ टक्के पदे रिक्त आहेत. खासगी दवाखाण्यात जाऊन उपचार घेण्याची आर्थिक कुवत येथील नागरिकांमध्ये नाही. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेवरच नागरिकांना अवलंबून राहावे लागते. नियमित आरोग्य सेवा देतानाच आरोग्य कर्मचाºयांना कोरोनाशीही लढावे लागत आहे. आरोग्य कर्मचाºयांनी आजपर्यंत केलेले काम प्रशंसेस पात्र ठरले आहे.