आरोग्य विभागाने आवश्यक ते प्रस्ताव सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:13+5:30

नागरिकांनी आतापर्यंत केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा आज ग्रिन झोनमध्ये आहे. यानंतरही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करु न आपला जिल्हा कायम ग्रिन झोनमध्ये राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ना.वडेट्टीवार यांनी केले.

 The health department should submit the necessary proposals | आरोग्य विभागाने आवश्यक ते प्रस्ताव सादर करावे

आरोग्य विभागाने आवश्यक ते प्रस्ताव सादर करावे

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची सूचना : जिल्हा ग्रीन झोन राहण्याची दक्षता घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावे. त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन ते प्रश्न मार्गी लावले जातील. व्हेंटीलेटर, लॅब उभारणी याकरीता आवश्यक मंजुरी आणि निधी तातडीने देण्यात येईल, अशी सूचना मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
नागरिकांनी आतापर्यंत केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा आज ग्रिन झोनमध्ये आहे. यानंतरही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करु न आपला जिल्हा कायम ग्रिन झोनमध्ये राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ना.वडेट्टीवार यांनी केले.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ ठुबे उपस्थित होते. क्वॉरंटाइन केलेले काही लोक घरी जाण्यासाठी आग्रह करत आहेत. काही लोकप्रतिनिधीसुद्धा घरी जाण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून आग्रह करू नये. जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु याविषयीही तक्र ारी प्राप्त होत असून व्यापारी वर्गाने दुकानामध्ये गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना त्यांनी केली.

क्वॉरंटाईनमध्ये १९ हजार १३१ नागरिक
जिल्ह्यात एकूण १८ हजार ८४४ मजूर गेल्या आठवड्यात बाहेरु न आलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ४००९ तर राज्याबाहेरून १४ हजार ८३५ लोक आलेले आहेत. त्यात फिलिपाईन्स या देशामधून एक स्थानिक व्यक्ती आलेला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नसली तरी क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत २४६८ लोक बाहेर गेले आहेत. ४२ हजार १९९ लोकांना आतापर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. यातील १९ हजार १३१ लोकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे.

Web Title:  The health department should submit the necessary proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.