शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

खतांसाठी करावा लागतो १०० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत.

ठळक मुद्देदेचलीपेठा परिसरात युरियाचा तुटवडा : चारचाकी व ट्रॅक्टरद्वारे शेतकरी आणतात निविष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कृषी केंद्रांवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना झाला नाही. या भागातील अनेक शेतकरी ८० ते १०० किमी अंतरावरील सिरोंचा, अहेरी, आलापल्ली व जिमलगट्टा येथून भाड्याचे चारचाकी वाहन ट्रॅक्टरवर खते आणत आहेत.जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत. देचलीपेठा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सिरोंचावरून युरिया खत मागविले. ते सिरोंचावरून रात्री ३ वाजता सकाळी ११ वाजता देचलीपेठा येथे पोहोचले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना ८० ते १०० किमी अंतरावर युरिया खत आणावा लागत आहे.युरिया खताचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र देचलीपेठा परिसरात अद्यापही युरिया खत पाठविले नाही. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना बाहेरून स्वत: खते आणावी लागत आहेत. यासाठी वाहन भाड्यासह मजुरीचा भूर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन देचलीपेठा परिसरात खत उपलब्ध करावे, अशी मागणी २५ गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मोहिमेचा फज्जा‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ ही मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविली जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने योजनेचा फज्जा उडत आहे. देचलीपेठा परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. आवागमनासाठी पक्के रस्ते नाही. अशा स्थितीत शेतकरी बऱ्याच अंतरावरून भाड्याच्या वाहनात खते आणत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती