शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

खतांसाठी करावा लागतो १०० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत.

ठळक मुद्देदेचलीपेठा परिसरात युरियाचा तुटवडा : चारचाकी व ट्रॅक्टरद्वारे शेतकरी आणतात निविष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कृषी केंद्रांवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना झाला नाही. या भागातील अनेक शेतकरी ८० ते १०० किमी अंतरावरील सिरोंचा, अहेरी, आलापल्ली व जिमलगट्टा येथून भाड्याचे चारचाकी वाहन ट्रॅक्टरवर खते आणत आहेत.जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत. देचलीपेठा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सिरोंचावरून युरिया खत मागविले. ते सिरोंचावरून रात्री ३ वाजता सकाळी ११ वाजता देचलीपेठा येथे पोहोचले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना ८० ते १०० किमी अंतरावर युरिया खत आणावा लागत आहे.युरिया खताचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र देचलीपेठा परिसरात अद्यापही युरिया खत पाठविले नाही. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना बाहेरून स्वत: खते आणावी लागत आहेत. यासाठी वाहन भाड्यासह मजुरीचा भूर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन देचलीपेठा परिसरात खत उपलब्ध करावे, अशी मागणी २५ गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मोहिमेचा फज्जा‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ ही मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविली जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने योजनेचा फज्जा उडत आहे. देचलीपेठा परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. आवागमनासाठी पक्के रस्ते नाही. अशा स्थितीत शेतकरी बऱ्याच अंतरावरून भाड्याच्या वाहनात खते आणत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती