शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

खतांसाठी करावा लागतो १०० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत.

ठळक मुद्देदेचलीपेठा परिसरात युरियाचा तुटवडा : चारचाकी व ट्रॅक्टरद्वारे शेतकरी आणतात निविष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कृषी केंद्रांवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना झाला नाही. या भागातील अनेक शेतकरी ८० ते १०० किमी अंतरावरील सिरोंचा, अहेरी, आलापल्ली व जिमलगट्टा येथून भाड्याचे चारचाकी वाहन ट्रॅक्टरवर खते आणत आहेत.जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत. देचलीपेठा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सिरोंचावरून युरिया खत मागविले. ते सिरोंचावरून रात्री ३ वाजता सकाळी ११ वाजता देचलीपेठा येथे पोहोचले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना ८० ते १०० किमी अंतरावर युरिया खत आणावा लागत आहे.युरिया खताचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र देचलीपेठा परिसरात अद्यापही युरिया खत पाठविले नाही. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना बाहेरून स्वत: खते आणावी लागत आहेत. यासाठी वाहन भाड्यासह मजुरीचा भूर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन देचलीपेठा परिसरात खत उपलब्ध करावे, अशी मागणी २५ गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मोहिमेचा फज्जा‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ ही मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविली जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने योजनेचा फज्जा उडत आहे. देचलीपेठा परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. आवागमनासाठी पक्के रस्ते नाही. अशा स्थितीत शेतकरी बऱ्याच अंतरावरून भाड्याच्या वाहनात खते आणत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती