लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कृषी केंद्रांवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना झाला नाही. या भागातील अनेक शेतकरी ८० ते १०० किमी अंतरावरील सिरोंचा, अहेरी, आलापल्ली व जिमलगट्टा येथून भाड्याचे चारचाकी वाहन ट्रॅक्टरवर खते आणत आहेत.जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत. देचलीपेठा परिसरातील काही शेतकऱ्यांनी सिरोंचावरून युरिया खत मागविले. ते सिरोंचावरून रात्री ३ वाजता सकाळी ११ वाजता देचलीपेठा येथे पोहोचले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना ८० ते १०० किमी अंतरावर युरिया खत आणावा लागत आहे.युरिया खताचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र देचलीपेठा परिसरात अद्यापही युरिया खत पाठविले नाही. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना बाहेरून स्वत: खते आणावी लागत आहेत. यासाठी वाहन भाड्यासह मजुरीचा भूर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन देचलीपेठा परिसरात खत उपलब्ध करावे, अशी मागणी २५ गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मोहिमेचा फज्जा‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे’ ही मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविली जात आहे. परंतु या मोहिमेचा लाभ देचलीपेठा परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने योजनेचा फज्जा उडत आहे. देचलीपेठा परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. आवागमनासाठी पक्के रस्ते नाही. अशा स्थितीत शेतकरी बऱ्याच अंतरावरून भाड्याच्या वाहनात खते आणत आहेत.
खतांसाठी करावा लागतो १०० किमीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST
जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा येथून युरिया खत आणत आहेत. अनेक शेतकरी रात्रभर प्रवास करून दुकान तसेच गाव गाठत आहेत.
खतांसाठी करावा लागतो १०० किमीचा प्रवास
ठळक मुद्देदेचलीपेठा परिसरात युरियाचा तुटवडा : चारचाकी व ट्रॅक्टरद्वारे शेतकरी आणतात निविष्ठा