चिरंतर विकासासाठी वैज्ञानिकवृत्ती बाळगा
By Admin | Updated: December 20, 2014 01:33 IST2014-12-20T01:33:33+5:302014-12-20T01:33:33+5:30
कोणतीही गोष्ट पूर्णत: समजल्याशिवाय ती गोष्ट व्यक्तीला आत्मसात करता येत नाही. विज्ञानाचे अनेक फायदे व तोटे आहेत.

चिरंतर विकासासाठी वैज्ञानिकवृत्ती बाळगा
गडचिरोली : कोणतीही गोष्ट पूर्णत: समजल्याशिवाय ती गोष्ट व्यक्तीला आत्मसात करता येत नाही. विज्ञानाचे अनेक फायदे व तोटे आहेत. त्यामुळे दैनंदिन आयुष्य सुकर व सुखद करण्यासाठी विज्ञान समजणे गरजेचे आहे. त्यामुळे चिरंतर विकासासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक वृत्ती बाळगावी, असे आवाहन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.
विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे तर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जि.प. सदस्य रेखा मडावी, नंदा दुर्गे, पुनम गुरनुले, जयमाला पेंदाम, शांता परसे, मनोहर पोरेटी, पद्माकर मानकर, अशोक इंदूरकर, अमोल मारकवार, प्राचार्य अॅनिस मैथू, शिक्षणाधिकारी उल्हास नरड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती अतुल गण्यारपवार, विश्वास भोवते, सुवर्णा खरवडे, जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट आदींनी विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी नरड तर संचालन मनोज उईके यांनी केले.