शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजीपाल्यातून साधली उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:43 AM

निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देरामपुरात चार एकरात लागवड : शेतकऱ्याने अनेक मजुरांनाही दिला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे. यातून शेतकऱ्याने स्वत:ची तर आर्थिक उन्नती साधली. शिवाय गावातील १५ ते २० मजुरांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.रामपूर येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर खरकाटे यांनी गाढवी नदी काठावर असलेल्या स्वत:च्या चार एक शेतजमिनीवर सुरुवातीला सिंचनाची व्यवस्था करण्याकरिता नदीमध्ये मोटारपंप बसविला. शेतात विविध प्रजातींच्या आंब्याची रोपे लावली. जवळपास १५ झाडे सध्या मोठी झाली असून दरवर्षी हजारो रूपयांची उत्पादन ते देत आहेत. गेल्या १० वर्षापासून चार एकर जागेत चवळी, कोबी, वांगी, भेंटी, कारले, टमाटर, मिरची तर काही जागेत मक्का असा विविध प्रकारचा भाजीपाला व पिके शेतकरी खरकाटे घेत आहेत. शेतात भाजीपाला लागवड करणे, कोडकी करणे, भाजीपाला तोडणे या कामाकरिता नियमित १५ ते २० महिला खरकाटे यांच्याकडे कामाला असतात. त्यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळाला आहे.भाजीपाल्याच्या हंगामात दररोज तीन ते चार क्विंटल भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. शासन रोजगार देण्याकरिता कमी पडत असले तरी शेतकरी गावातील मजुरांना वर्षभर रोजगार देत आहे. शिवाय आपली आर्थिक उन्नतीही साधत आहे. खरकाटे यांची ही शेती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी