शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:06 IST

सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.

ठळक मुद्देसंभाजी चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड नागपूर आणि अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळेचे आयोजन दिनांक २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते़ या कार्यशाळेदरम्यान डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेला विभागीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत, अ‍ॅग्रोेव्हिजन फाऊंडेशनचे संतोष डुकरे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी सभापती नाना नाकाडे, आर.सी.ओ.एफ.चे सहसंचालक डॉ. वाय.व्ही.देवघरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, वृंदा काटे आदी उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान संतोष डुकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणारे फळ, सिंदी, आंबा व धानपीक यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शेतकºयांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. संभाजी चव्हाण यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, योजना, अनुदाने, निर्यातीतील संधी, निर्यात कशी करायची, निर्यातीसाठी असलेल्या सुविधा, परदेश व्यापार आदी बाबतची माहिती दिली. डॉ.प्रकाश पवार यांनी गडचिरोली जिल्हा सेंद्रीय पिकविल्या जाणाºया धान, तूर व इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकरी गटांमार्फत शेतमाल प्रक्रियेलाही गती दिली जात आहे. येथील सेंद्रीय शेती उत्पादकांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे, असे मार्गदर्शन केले.धानासोबतच आयुर्वेदिक पिकांचे उत्पादन करून प्रगतीकडे जाण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतमालाच्या माहितीबाबत काही शंका असल्यास शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोेली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी देशाअंतर्गत बाजारपेठ काबिज करून निर्यात प्रोत्साहन करण्यास प्रशासन अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वोतोपरी शेतकºयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.अमरशेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवस पिकासाच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अनिल तारू, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी