शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:06 IST

सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.

ठळक मुद्देसंभाजी चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड नागपूर आणि अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळेचे आयोजन दिनांक २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते़ या कार्यशाळेदरम्यान डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेला विभागीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत, अ‍ॅग्रोेव्हिजन फाऊंडेशनचे संतोष डुकरे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी सभापती नाना नाकाडे, आर.सी.ओ.एफ.चे सहसंचालक डॉ. वाय.व्ही.देवघरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, वृंदा काटे आदी उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान संतोष डुकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणारे फळ, सिंदी, आंबा व धानपीक यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शेतकºयांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. संभाजी चव्हाण यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, योजना, अनुदाने, निर्यातीतील संधी, निर्यात कशी करायची, निर्यातीसाठी असलेल्या सुविधा, परदेश व्यापार आदी बाबतची माहिती दिली. डॉ.प्रकाश पवार यांनी गडचिरोली जिल्हा सेंद्रीय पिकविल्या जाणाºया धान, तूर व इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकरी गटांमार्फत शेतमाल प्रक्रियेलाही गती दिली जात आहे. येथील सेंद्रीय शेती उत्पादकांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे, असे मार्गदर्शन केले.धानासोबतच आयुर्वेदिक पिकांचे उत्पादन करून प्रगतीकडे जाण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतमालाच्या माहितीबाबत काही शंका असल्यास शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोेली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी देशाअंतर्गत बाजारपेठ काबिज करून निर्यात प्रोत्साहन करण्यास प्रशासन अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वोतोपरी शेतकºयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.अमरशेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवस पिकासाच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अनिल तारू, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी