शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:06 IST

सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.

ठळक मुद्देसंभाजी चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड नागपूर आणि अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळेचे आयोजन दिनांक २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते़ या कार्यशाळेदरम्यान डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेला विभागीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत, अ‍ॅग्रोेव्हिजन फाऊंडेशनचे संतोष डुकरे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी सभापती नाना नाकाडे, आर.सी.ओ.एफ.चे सहसंचालक डॉ. वाय.व्ही.देवघरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, वृंदा काटे आदी उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान संतोष डुकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणारे फळ, सिंदी, आंबा व धानपीक यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शेतकºयांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. संभाजी चव्हाण यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, योजना, अनुदाने, निर्यातीतील संधी, निर्यात कशी करायची, निर्यातीसाठी असलेल्या सुविधा, परदेश व्यापार आदी बाबतची माहिती दिली. डॉ.प्रकाश पवार यांनी गडचिरोली जिल्हा सेंद्रीय पिकविल्या जाणाºया धान, तूर व इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकरी गटांमार्फत शेतमाल प्रक्रियेलाही गती दिली जात आहे. येथील सेंद्रीय शेती उत्पादकांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे, असे मार्गदर्शन केले.धानासोबतच आयुर्वेदिक पिकांचे उत्पादन करून प्रगतीकडे जाण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतमालाच्या माहितीबाबत काही शंका असल्यास शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोेली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी देशाअंतर्गत बाजारपेठ काबिज करून निर्यात प्रोत्साहन करण्यास प्रशासन अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वोतोपरी शेतकºयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.अमरशेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवस पिकासाच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अनिल तारू, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी