शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल महोदय, आता परंपरा मोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

जवळपास १६ ते १७ वर्षाआधी या जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम आणि मागास तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याला तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी भेट दिली. एका मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी भामरागड तालुक्याला दत्तक घेण्याचे जाहीर केले. आता भामरागडचा कायापालट होणार म्हणून समस्त तालुकावासिय हरखून गेले होते.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या राजधानीपासून सर्वाधिक लांब आणि एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येत आहेत. खरं तर या जिल्ह्यात व्हीव्हीआयपी लोकांना येताना अनेक अडचणी असतात. प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. मात्र तरीही मुख्यमंत्री, राज्यपाल योग्य वेळ पाहून आल्याशिवाय राहात नाही.ज्यांच्या हाती राज्याची धुरा असते असे मोठे व्यक्तिमत्व जिल्ह्यात आले म्हणजे या जिल्हावासियांच्या आशा पल्लवित होतात. काहीतरी नवीन घोषणा होते का, या जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस काही केले जाते का, आरोग्याची समस्या, बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जातील का, अशा एक ना अनेक आशावादी विचार या जिल्हावासियांच्या मनात डोकावत असतात. मात्र दुर्दैवाने बहुतांश वेळा निराशाच पदरी पडते. आजही हा जिल्हा देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांच्या यादीत मोडत आहे. आकांक्षित जिल्हा या नात्याने गडचिरोलीला विशिष्ट मुद्द्यांच्या आधारावर विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली, पण त्याचे सकारात्मक परिणाम आजतरी ठोसपणे पहायला मिळत नाही.जवळपास १६ ते १७ वर्षाआधी या जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम आणि मागास तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याला तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी भेट दिली. एका मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी भामरागड तालुक्याला दत्तक घेण्याचे जाहीर केले. आता भामरागडचा कायापालट होणार म्हणून समस्त तालुकावासिय हरखून गेले होते. पण राज्यपालांच्या कल्पनेतील दत्तक भामरागड कसे होते हे कोणालाच कळले नाही. आजही रुग्णांना खाटेवरूनच आणले जात आहे. पुढे मोहम्मद फैजल यांच्या रुपाने दुसºया राज्यपालांचे पाय भामरागडला लागले. त्यांनीही अधिकारी, नागरिकांशी चर्चा केली, मात्र आजही अनेक गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. २००९ मध्ये एस.सी. जमीर हे तिसरे राज्यपाल भामरागडला आले. पण परिस्थितीत फरक पडला नाही. २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भामरागडला भेट देऊन पर्लकोटा नदीवर उंच पूल उभारण्याचे आश्वासन दिले होते, पण आजही शेकडो गावांना पर्लकोटाच्या पुलामुळे संपर्काबाहेर राहावे लागते.राज्यपाल के.विद्यासागर राव मेडिगड्डाच्या भूमिपूजन, लोकार्पणाला आले, मात्र सिरोंचा किंवा इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना आजही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सर्वाधिक वेळ या जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड केला. मात्र त्यांनी कुदळ मारलेला कोनसरीचा लोहखनिज प्रकल्प सुरू झाला नाही, ना त्यांनी लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी चाबी वाटप केलेले ट्रक धावताना दिसत नाही. बेरोजगारीचे चºहाड दिवसागणिक वाढतच आहे. आता राज्यपाल कोश्यारी यांची भेट याच परंपरेला पुढे चालवणारी ठरू नये, एवढीच अपेक्षा.अधिकारी व नागरिकांशीही साधणार संवादगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच येत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोली येथील नियोजन भवनात दुपारी २.२० वाजता सरकारी अधिकाºयांसह काही नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या चर्चेत ते जिल्ह्यातील प्रमुख समस्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी सकाळी १० वाजता आलापल्ली येथे हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर सर्वप्रथम उडान सौरउर्जा पॅनल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित एकलव्य मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम आटोपून राज्यपाल गडचिरोलीतील महिला रुग्णालयातील विविध सुविधांची पाहणी करून तेथील डॉक्टर व कर्मचाºयांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २.२० वाजता नियोजन भवनात जाणार आहेत.