शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:15 IST

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा आरोप : देसाईगंजात महापर्दाफाश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात आहे. स्वत: केलेले पाप लपविण्यासाठीच सरकारकडून दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख, माजी खा.नाना पटोले यांनी केला. या फेकू सरकारची सत्ता उलथवून लावणारच, असा विश्वासही त्यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.देसाईगंज येथील लाखांदूर मार्गावरच्या सभागृहात बुधवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महापर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश पदाधिकारी रवींद्र दरेकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड.संजय गुरू, जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भागवत नाकाडे, शीला पटले, मनीषा दोनाडकर, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरिफ खानानी आदी आजी-माजी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपच्या सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्या संविधानाच्या भरवशावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच संविधानाला जाळण्याचे पाप या सरकारच्या काळात होऊनसुद्धा यातील आरोपी मोकाट आहेत, असा ठपका पटोले यांनी ठेवला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सूरजागड लोहप्रकल्प मार्गी लावून लगतच्या चारही जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देणार, तसेच शेती सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड.संजय गुरू, संचालन परसराम टिकले यांनी तर आभार भूषण अलामे यांनी मानले. सभेला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बिघडलेकाँग्रेसच्या महापर्दाफाश सभा देसाईगंज आणि गडचिरोली येथे आयोजित केल्या होत्या. देसाईगंज येथील सभा दुपारी ३ वाजता तर गडचिरोली येथील सभा सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे पदाधिकाºयांनी जाहीर केले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सभांना उशीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले सायंकाळी ६ वाजता देसाईगंजमध्ये पोहोचले. गडचिरोलीतील सभा ही उशिराने सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या निमंत्रणात देसाईगंज येथील कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस