शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:15 IST

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा आरोप : देसाईगंजात महापर्दाफाश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात आहे. स्वत: केलेले पाप लपविण्यासाठीच सरकारकडून दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख, माजी खा.नाना पटोले यांनी केला. या फेकू सरकारची सत्ता उलथवून लावणारच, असा विश्वासही त्यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.देसाईगंज येथील लाखांदूर मार्गावरच्या सभागृहात बुधवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महापर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश पदाधिकारी रवींद्र दरेकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड.संजय गुरू, जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भागवत नाकाडे, शीला पटले, मनीषा दोनाडकर, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरिफ खानानी आदी आजी-माजी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपच्या सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्या संविधानाच्या भरवशावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच संविधानाला जाळण्याचे पाप या सरकारच्या काळात होऊनसुद्धा यातील आरोपी मोकाट आहेत, असा ठपका पटोले यांनी ठेवला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सूरजागड लोहप्रकल्प मार्गी लावून लगतच्या चारही जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देणार, तसेच शेती सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड.संजय गुरू, संचालन परसराम टिकले यांनी तर आभार भूषण अलामे यांनी मानले. सभेला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बिघडलेकाँग्रेसच्या महापर्दाफाश सभा देसाईगंज आणि गडचिरोली येथे आयोजित केल्या होत्या. देसाईगंज येथील सभा दुपारी ३ वाजता तर गडचिरोली येथील सभा सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे पदाधिकाºयांनी जाहीर केले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सभांना उशीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले सायंकाळी ६ वाजता देसाईगंजमध्ये पोहोचले. गडचिरोलीतील सभा ही उशिराने सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या निमंत्रणात देसाईगंज येथील कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस