शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
2
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
3
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
5
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
6
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
7
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
9
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
10
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
11
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
12
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
14
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
15
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
16
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
17
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
18
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
19
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
20
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार

लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.

ठळक मुद्दे१० जूनला होता कार्यक्रम : अहेरीजवळील अपघात ठरला त्यांच्यासाठी काळ

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.गोपाल महतो हा मूळचा अहेरीचा रहिवासी आहे, तर कुंदा गावडे ही एटापल्ली तालुक्यातील बिड्री गावची रहिवासी आहे. गोपाल व कुंदा एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोपाल हा अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तर कुंदा हिने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केला होता. एप्रिल महिन्यात गोपाल व कुंदाने नोंदणी पध्दतीने विवाह केला. कुंदा ही आदिवासी समाजाची असल्याने ती गावात लग्नाचा छोटेखानी कार्यक्रम करणार होती. त्यानंतर १० जून रोजी अहेरी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवण्याचे ठरले होते. याच संबंधात कुंदाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी दोघेही अहेरीवरून बिड्री गावाकडे दुचाकीने निघाले होते. मात्र अहेरीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात गोपाल हा जागीच ठार झाला. कुंदा सुध्दा गंभीर जखमी झाली होती. कुंदाला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कुंदाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. गोपाल व कुंदाच्या अकाली निधनाने महतो व गावडे परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. गोपाल अहेरी रूग्णालयात काम करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभावाचा व प्रत्येकीच्या मदतीला धाऊन जाणारा कर्मचारी म्हणून गोपालची रूग्णालयात ओळख होती. दोघांवरही अहेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.हेल्मेटने वाचले असते प्राणअहेरीजवळ झालेल्या अपघातात गोपाल, कुंदा यांच्यासह दुसरा दुचाकीस्वार संतोष दुधलवार हे तिघे ठार झाले. या तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. वाहतुकीचे नियम पाळून दुचाकीस्वारांनी डोक्यात हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. अहेरी-आलापल्ली मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक व खडतर झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू