शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.

ठळक मुद्दे१० जूनला होता कार्यक्रम : अहेरीजवळील अपघात ठरला त्यांच्यासाठी काळ

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.गोपाल महतो हा मूळचा अहेरीचा रहिवासी आहे, तर कुंदा गावडे ही एटापल्ली तालुक्यातील बिड्री गावची रहिवासी आहे. गोपाल व कुंदा एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोपाल हा अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तर कुंदा हिने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केला होता. एप्रिल महिन्यात गोपाल व कुंदाने नोंदणी पध्दतीने विवाह केला. कुंदा ही आदिवासी समाजाची असल्याने ती गावात लग्नाचा छोटेखानी कार्यक्रम करणार होती. त्यानंतर १० जून रोजी अहेरी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवण्याचे ठरले होते. याच संबंधात कुंदाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी दोघेही अहेरीवरून बिड्री गावाकडे दुचाकीने निघाले होते. मात्र अहेरीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात गोपाल हा जागीच ठार झाला. कुंदा सुध्दा गंभीर जखमी झाली होती. कुंदाला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कुंदाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. गोपाल व कुंदाच्या अकाली निधनाने महतो व गावडे परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. गोपाल अहेरी रूग्णालयात काम करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभावाचा व प्रत्येकीच्या मदतीला धाऊन जाणारा कर्मचारी म्हणून गोपालची रूग्णालयात ओळख होती. दोघांवरही अहेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.हेल्मेटने वाचले असते प्राणअहेरीजवळ झालेल्या अपघातात गोपाल, कुंदा यांच्यासह दुसरा दुचाकीस्वार संतोष दुधलवार हे तिघे ठार झाले. या तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. वाहतुकीचे नियम पाळून दुचाकीस्वारांनी डोक्यात हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. अहेरी-आलापल्ली मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक व खडतर झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू