गोंडवानाचा प्रदेश आत्मनिर्भर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:00+5:302021-02-05T08:50:00+5:30
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) बंगलोरचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा हेसुद्धा ऑनलाइन पद्धतीने ...

गोंडवानाचा प्रदेश आत्मनिर्भर करावा
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) बंगलोरचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा हेसुद्धा ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. याशिवाय गोंडवानाचे कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलसचिव डॉ.अनिल चिताडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ.एस.सी. शर्मा यांनी भारतातल्या विविध आदिवासी जमातीमध्ये गोंड सगळ्यात मोठे आदिवासी आहे. जे भारताच्या मध्य पर्वतीय भागामध्ये राहतात. ते दृढ निश्चयी आणि मेहनती आहेत. आचार्य पदवीप्राप्त व सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थी विश्वकल्याणाकरिता आपले जीवन सर्मपित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरु डाॅ. वरखेडी म्हणाले, आपण ऐतिहासिक भूमीचे वारसदार आहात. गोंडवाना आणि शहीद बिरसा मुंडा, बाबा आमटे, देवाजी तोफा यांच्यासारख्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ही भूमी आहे. त्यांच्या कार्यामुळे आणि योगदानाने भारताचा इतिहास समृद्ध झाला आहे.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिल्पा आठवले व डॉ.नरेंद्र आरेकर यांनी तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यू-ट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
(बॉक्स)
कुलगुरुंनी केली विशेष दर्जा देण्याची मागणी
याप्रसंगी कुलगुरु डॉ.वरखेडी यांनी आदिवासी आणि वनविद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी केली. पदव्युत्तर शिक्षण विभागासाठी, परीक्षा व प्रशासकीय विभागासाठी, इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करावा. स्थानिक आदिवासी कलाकार आणि लोकनाट्य यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सांस्कृतिक सभागृह मंजूर करावे, स्वतंत्र सहसंचालक कार्यालय मंजूर करावे तसेच मॉडेल कॉलेज बांधण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबतच्या मागण्या आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
(बॉक्स)
२२ जणांना सुवर्णपदक, तर ६९ जणांना आचार्य पदवी
या दीक्षांत समारंभात २२ विद्यार्थ्यांना ३२ सुवर्णपदके आणि ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रत्यक्षात, तर अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य व विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य, दानदाते तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी या कार्यक्रमाचा आभासी पद्धतीने लाभ घेतला.