शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

गोकुलनगर बायपास मार्गाची अवस्था बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:30 IST

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासन सुस्त : आवागमनासाठी वाहनधारकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे आवागमनासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली शहरातील गोकुलनगर बायपास, रेड्डीगोडाऊन बायपास, धानोरा मार्गावरून शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊन चौकाला जोडणाºया मार्गाची बकाल अवस्था झाली आहे. सदर तिन्ही मार्गावर वाहनांची वर्दळ दिवसा व सायंकाळी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय शहरातील कारमेल शाळेच्या मागील परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते. आता पावसाळा लागल्यामुळे या वस्तीतील अनेक रस्त्यांना दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंद नगर व गोकुलनगर, चनकाई नगर व इतर भागातील रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. सदर रस्त्यांची पक्की दुरूस्ती करण्यात यावी अथवा सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते पालिकेने तयार करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. लांझेडा, इंदिरा नगर, फुले वार्ड, बसेरा कॉलनी, शिक्षक कॉलनी व इतर बºयाच भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याने छोट्या नाल्या तुडूंब भरतात. सदर पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.चिखलमय रस्त्यावर मुरूम पडण्यास एक महिना लागणारगडचिरोली नगर पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चिखल निर्माण होणाºया अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकून आवागमनासाठी नागरिकांची सुविधा केली जाते. मात्र यंदा पालिका प्रशासनाच्या वतीने मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीत बराच विलंब होत आहे. सदर कार्यवाहीसाठी सुरूवातीला न.प.च्या सभेत ठराव पारित करावा लागतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाच्या वतीने अद्यापही मुरूमाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. टेंडर न झाल्याने अंतर्गत चिखलमय रस्त्यावर प्रत्यक्ष मुरूम पडण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस