शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

गोकुलनगर बायपास मार्गाची अवस्था बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:30 IST

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासन सुस्त : आवागमनासाठी वाहनधारकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे आवागमनासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली शहरातील गोकुलनगर बायपास, रेड्डीगोडाऊन बायपास, धानोरा मार्गावरून शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊन चौकाला जोडणाºया मार्गाची बकाल अवस्था झाली आहे. सदर तिन्ही मार्गावर वाहनांची वर्दळ दिवसा व सायंकाळी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय शहरातील कारमेल शाळेच्या मागील परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते. आता पावसाळा लागल्यामुळे या वस्तीतील अनेक रस्त्यांना दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंद नगर व गोकुलनगर, चनकाई नगर व इतर भागातील रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. सदर रस्त्यांची पक्की दुरूस्ती करण्यात यावी अथवा सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते पालिकेने तयार करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. लांझेडा, इंदिरा नगर, फुले वार्ड, बसेरा कॉलनी, शिक्षक कॉलनी व इतर बºयाच भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याने छोट्या नाल्या तुडूंब भरतात. सदर पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.चिखलमय रस्त्यावर मुरूम पडण्यास एक महिना लागणारगडचिरोली नगर पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चिखल निर्माण होणाºया अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकून आवागमनासाठी नागरिकांची सुविधा केली जाते. मात्र यंदा पालिका प्रशासनाच्या वतीने मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीत बराच विलंब होत आहे. सदर कार्यवाहीसाठी सुरूवातीला न.प.च्या सभेत ठराव पारित करावा लागतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाच्या वतीने अद्यापही मुरूमाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. टेंडर न झाल्याने अंतर्गत चिखलमय रस्त्यावर प्रत्यक्ष मुरूम पडण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस