शहरं
Join us  
Trending Stories
1
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
4
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
5
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
6
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
7
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
8
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
9
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
10
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
11
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
12
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
13
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
14
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
15
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
17
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
18
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
19
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
20
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत मुसळधार पाऊस -वीज पडून ४३ शेळ्या ठार

By admin | Updated: May 16, 2015 01:55 IST

गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

तीन लाखांचे नुकसान : मारोडा गावात कळपावर वज्राघात
गडचिरोली/चामोर्शी : गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर चामोशी मुख्यालयापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मारोडा गावात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज पडून ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्याची घटना घडली. या घटनेत २० शेळ्या जखमी झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावातील कामरा राजन्ना निलावार हे आपल्या मालकीच्या शेळ्या-मेंढ्या घेऊन उमाजी माधव मोहुर्ले यांच्या शेतात थांबलेले होते. दरम्यान अचानक शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम. जी. वैद्य, सहायक पोलीस निरिक्षक हुर्रे, मारोडाचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोवाची, डॉ. देवकुळे, डॉ. खाडे, डॉ. सरकार, डॉ. नैताम यांच्या चमुने मृत शेळ्या-मेंढ्यांवर शवविच्छेदन केले. जखमी असलेल्या २० शेळ्यांवर औषधोपचार करण्यात आले. निलावार यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केली आहे.
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाला. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधेमध्ये वादळी वाऱ्यासह काही भागात पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दुपारी दीड ते दोनच्या सुमारास संततधार पाऊस गडचिरोली शहरात झाला. त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. शहरातील रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वादळाने झाडांच्या फांद्याही तुटल्या तर काही ठिकाणी फलक उडाले. पावसामुळे रस्त्यावरची वाहतुकीही खोळंबलेली होती. मे महिन्याच्या मध्यार्धात पाऊस आल्याने शेतकरी आता शेतीच्या कामाला लागेल. लग्नाचा तसेच वास्तू कार्यक्रमाचाही शुक्रवारी ठोक होता. त्यांचीही अकाली पावसामुळे तारांबळ उडाली. शहरातील वीज पुरवठाही दिवसा अनेकदा वादळी पावसामुळे खंडीत झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा रात्री व दिवसाही खंडीत होत आहे.