शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने धानपीक सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:16 IST

पाण्याच्या वेगवान प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी गडचिरोली जिल्ह्यात उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धान सडून गेले आहे.

ठळक मुद्देमंगळवार, बुधवारी बरसला धोधो पाऊसशेताला जलाशयाचे रूप गाढवी नदी, नाल्याच्या काठावरील धानशेतीचे नुकसान

अतुल बुराडेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: पाऊस, अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. चालू आठवड्यातील सोमवारच्या रात्री, मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीही जोराचा पाऊस कोसळला. याआधी फक्त दोन-चार दिवस कोरडे गेले होते. त्यापूर्वी सुद्धा पंधरा-वीस दिवस पावसाची झळ सुरूच होती. त्यामुळे गाढवी नदी, नाले, बोड्या, तलाव, शेतातील बांध्यांमध्ये पाणी होतेच. परिणामस्वरूप या आठवड्यात आलेल्या धोधो पावसाने जलसाठ्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गाढवी नदीतील पाणी वाढल्याने नदीच्या काठालगतच्या शेतात नदीचे पाणी शिरले. गाढवी नदीचा जलस्तर वाढला की या नदीला येऊन भेटणारे एकलपूर-विसोरा, विसोरा-तुळशी, शंकरपुर-चोप, शंकरपुर-विठ्ठलगाव, पोटगाव-विहिरगाव या मार्गावरील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचे पाणी स्थिर होते. पाणी स्थिर झाल्याने नाल्याचे पाणी नाल्याच्या चहुकडे पसरून जणू सरोवराचे रुपडे तयार झाले होते. त्यामुळे या सर्व नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेली शेती पाण्यात बुडाली. धानपीक पाण्यात बुडून राहिल्याने तसेच पाण्याच्या वेगवान प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धान सडून गेले आहे.यावर्षी उंदीर वाहनाचा मृग नक्षत्र एकदोन सरी वगळता गेला. हत्त्यावर आरूढ होऊन आलेला आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन-चार दिवस झाल्यावर चांगला पाऊस पडला. याच पावसाने जूनअखेर सुरू झालेली पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात संपली. आद्रार्ची शेवट पण चांगली झाली. ६ जुलैला सुरू झालेल्या मेंढ्यावरच्या पुनर्वसुने बळीराजाच्या डोळ्यात आसू आणले. हा नक्षत्र सर्वांत कोरडा राहिला. याच़ नक्षत्रात विसोरासह तुळशी, कोकडी, उसेगाव, विहिरगाव, शंकरपुर, कसारी भागातील धान वाफे करपले. उसेगाव येथील शेतकरी गोपल बोरकर यांनी तर ट्रँक्टर ट्रॉलीत प्लास्टिक ताडपत्री टाकून त्यात पाणी भरून धान पऱहे वाचविले. आता दुबार पेरणी करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना. गाढव वाहनाचा पुष्य नक्षत्र धानाला नवजीवन देणारा ठरला. आळशी हा बिरुद मिरवणारा आणि नेहमी चेष्टेचा विषय ठरणारा गाढव यंदा मात्र हिरो झाला. पुष्य नक्षत्र असा पाऊस घेऊन आला त्यामुळे धानवाफ्यांना नवसंजीवनी मिळाली. संततधार, मुसळधार, रिमझिम असा पाऊस शेतीसह शेतकरी आणि साऱ्यांना सुखावून गेला. करपलेले धान तरले. धानपऱहे रोवणीलायक झालेल्या शेतात रोवणी सुरू झाली. जुलैच्या मध्यापर्यंत कोरडे पडलेले जलसाठे पाण्याने भरू लागले. आषाढ महिना संपून श्रावण मासारंभ होताच २ ऑगस्टला पुष्य नक्षत्र संपला. आणि श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी (३ ऑगस्ट) बेडूकचा आश्लेषा नक्षत्र लागला. बेडकाने (आश्लेषा नक्षत्र) आधीच्या गाढवाने (पुष्य नक्षत्र) सुरू केलेली पाऊसयात्रा सुरूच ठेवली. काल (१६ ऑगस्ट) संपलेला आश्लेषा नक्षत्र दमदार बरसून गेला. मात्र नुकसान सुद्धा करून गेला.पुष्प नक्षत्राच्या पाण्याने नदी, तलाव, तलाव, बोड्या, नाले, रस्त्याकडेचे खड्डे पाण्याने शंभर टक्के भरले. त्यात आश्लेषाने पुन्हा जोरदार एन्ट्री मारली आणि सर्व जलस्त्रोत ओवरफ्लो झाले. पाऊस येतच राहिला आणि साचलेल्या नदी, नाल्यातील अतिरिक्त पाणी काठावरील शेतात घुसले आणि धानाची नासाडी झाली. विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदी किनाऱ्यावरील धानशेतीचे नुकसान झाले आहे. विहिरगाव ते पोटगाव दरम्यानच्या नाल्याकडेचे शेकडो हेक्टर धान पाण्यात बुडून राहिल्याने नष्ट झाले आहे. पुनर्वसु नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे आधीच करपलेले धानपऱहे पुष्य नक्षत्राच्या पाण्याने कसेबसे वाचले. रोवणी झाली आणि आता ही अतिवृष्टी झाल्याने धान सडून गेले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी विहिरगाव येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.विहिरगाव येथील दिनकर करंबे, नामदेव भुते, पांडुरंग पत्रे, मंसाराम दोनाडकर, गौतम शेंडे, मनोहर नाकतोडे, गोपीनाथ ठाकरे, दिवाकर दोनाडकर, विनायक गुरुनुले या शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिक पुराच्या पाण्याने नष्ट झाले आहे.यंदा पाऊस लेट आला. आमची शेती वरथेंबी पावसावर अवलंबून असल्याने धान पेरणी उशिरा झाली. मागच्या महिन्यात सुरुवातीला पाऊस नाही आला त्यामुळे धान वाळले पण मग पाऊस आला. धानपऱहे वाचले. आता रोवणी झाल्यावर हा मोठा पाऊस पडला. धान पाण्याखाली राहिला म्हणून धानपीक खराब झाले. सरकारने नुकसानभरपाई द्यावीप्रविण दोनाडकरशेतकरी, विहिरगाव

टॅग्स :agricultureशेती