भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:19+5:302021-05-09T04:38:19+5:30

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली ...

The four-lane bridge on Bhamragad road is blocked | भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली व कुमरगुडा गावाजवळ नाला आहे. या नाल्यांवर ठेंगणे पूल व रपटे आहेत. पावसाळ्यात पुलांवरून पुराचे पाणी वाहत असते. दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याहीवर्षी पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

भामरागड-आलापल्ली मार्गावर जागाेजागी खड्डे पडून दुरुवस्था झाली आहे. आलापल्लीपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी अडीच ते तीन तास प्रवास करावा लागताे. परंतु, सध्या रस्ता बांधकाम सुरू असल्याने ही समस्या सुटणार आहे. तसेच पेरमिली गावाजवळचा मोठा नाला व बांडिया नदीसह पर्लकोटा या मोठ्या नदीवरही उंच पूल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी चार-पाच दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटताे. परंतु, या पुलांचे बांधकाम झाल्यास संपर्क तुटणार नाही. बारमाही वाहतूक सुरू राहील. चंद्रनाला, कुडकेली नाला, ताडगाव व कुमरगुडा नाल्यांवर उंच पूल बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. पावसाळ्यात चंद्रनाला पार केला तरी कुडकेली नाला अडवितो. त्यानंतर पेरमिलीपर्यंतही परत जाता येत नाही. तसेच एकवेळ चंद्रनाला व कुडकेली नाला पार केला तर कधी ताडगाव नाला अडवितो किंवा ताडगाव नाला पार केला तर कुमरगुडा नाला वाट अडविताे. पावसाळ्यात थाेडाही पाऊस आल्यास ठेंगणे पूल व रपट्यांवरून पाणी वाहते. पावसाळ्यात ही स्थिती अनेकदा निर्माण हाेते. पायदळ, सायकल व मोटार सायकलस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. खासगी वाहनधारक व रात्री मुक्कामाच्या बसेस पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करतात. त्यामुळे चारही नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

बाॅक्स

अनावश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम

भामरागड-आलापल्ली मार्गावर अनेक ठिकाणी उंच पुलांची आवश्यकता आहे. परंतु, या ठिकाणी रपटे बांधून काम निभावण्यात आले. परंतु, ज्या ठिकाणी पुलाची अत्यंत आवश्यकता नसतानाही तेथे पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. अत्यावश्यक ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करून अनावश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम केले आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावर उंच पुलांचे बांधकाम करण्यासाठी अडचणी काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

===Photopath===

080521\08gad_4_08052021_30.jpg

===Caption===

उंच पूल बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेला कमी उंचीचा रपटा.

Web Title: The four-lane bridge on Bhamragad road is blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.