शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी धावतात चार बसेस

By admin | Updated: June 10, 2015 02:03 IST

स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

अहेरी : स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
अहेरी उपविभागात प्रवासी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने येथील जनतेला अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते. तीन वर्षांपूर्वी अहेरी आगाराची चांगली सेवा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होती. मात्र मागील काही दिवसांपासून येथील नियोजन ढेपाळत असल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी ११.४५ वाजता हा प्रकार आलापल्ली बसस्थानकावर दिसून आला. अहेरी आगाराच्या एम. एच. डी. ६८- ८३७ या अहेरी- चंद्रपूर या बसमध्ये केवळ एक प्रवासी बसला होता. एम. एच- ४०- ८८५७ या अहेरी-चंद्रपूर या बसमध्ये दोन प्रवासी एम. एच.- ४०- ५१७३ या अहेरी- नागपूर सुपर बसमध्ये सात प्रवासी तर एम. एच. ८७७० या चंद्रपूर आगाराच्या बसमध्ये केवळ चार प्रवासी बसले होते. या सर्व बसेस आलापल्ली बसस्थानकावर एकामागे एक उपस्थित उभ्या होत्या.
महत्त्वाचे म्हणजे यातील चार बसेस चंद्रपूरसाठी तर एक बस नागपूरसाठी होती. अहेरीपासून चंद्रपूरपर्यंत एकाच्या मागे एक बसेस धावतील तर त्यांना प्रवासी कसे मिळणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. अहेरी आगारातील नियोजन शून्यतेचा प्रकार यावरून स्पष्ट होते. याच बसस्थानकावर मुलचेराकडे जाणारी बस एक तासापासून आली नव्हती. त्यामुळे प्रवासी या ठिकाणी ताटकळत बसले होते. (तालुका प्रतिनिधी)