शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे हाेते पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते, ...

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यात ‘परिवार संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी अहेरी येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार धर्मरावबाबा अत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री अत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, रवींद्र सामला, आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांशी संवाद साधायला अहेरी येथे आलाे आहाेत. धर्मरावबाबा अत्राम यांना दिल्ली येथे पाठवायचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. हा लोकशाहीचा विजय आहे. गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मोठी पोलीस भरती घेऊन जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले. सुरजागड प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी आ. धर्मरावबाबा अत्राम यांनी गृहमंत्र्यांकडे केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरेंद्र अलोणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.