शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

मॅटच्या आच्छादनात फुलले भाजीपाल्याचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिरव्या व पांढºया रंगाच्या मॅटचे आच्छादन सदर शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देफरी गावात महत्त्वाकांक्षी प्रयोग : कृतीशील शेतकऱ्यांची आधुनिक शेती

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केवळ धान पिकाची शेती करतात. मात्र मोहटोला, किन्हाळा परिसरातील शेतकऱ्यांनी मॅटच्या आच्छादनात भाजीपाला पिकाची लागवड करून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे हा महत्त्वाकांक्षी प्रयोग फरी गावात सुरू आहे.फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिरव्या व पांढºया रंगाच्या मॅटचे आच्छादन सदर शेतकरी करीत आहेत. या आच्छादनाखाली कोथिंबीर, पालक, मेथी, मुळा, गाजर, कांदा, लसून आदी पिके घेतले जातात. तसेच आच्छादनाबाहेर गादीवाफे व पाळी तयार करून त्यावर भेंडी, कोहळा, काकडी, चवळी, दोडका यासारख्या भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. यातून बºयापैकी उत्पन्न मिळत असून धानपिकाच्या शेतीला भाजीपाल्याची ही शेती अतिशय पुरक व फायदेशिर असल्याचे उत्पादक शेतकºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.फरी गावालगत ६० वर्षीय अभिमन दिघोरे नामक शेतकºयाची दीड एकर शेतजमीन आहे. एका एकरात धानाचे व अर्ध्या एकरामध्ये भाजीपाल्याचे पीक दिघोरे घेत आहेत. आतापर्यंत मजुरीसह ५० हजार रुपयांचा खर्च या शेतकºयांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी केला आहे. चवळी, कोथिंबीर, पालक, भेंडी आदींचे उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व पिकांपासून लागवड खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे, अशी अपेक्षा या शेतकºयांनी लोकमतशी बोलताना दिले आहे. शेतीच्या कामात दिघोरे यांची पत्नी त्यांना पूर्णत: मदत करीत आहे. शासनाने पावसाळ्यात भाजीपाला पिकाची शेती करण्यासाठी आमच्यासारख्या सामान्य शेतकºयांना टिनाचे शेड उभारण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. अशा प्रकारे अनुदान मिळाल्यास बरेच शेतकरी बारमाही भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊ शकतात, असाही मानस शेतकरी अभिमन दिघोरे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :vegetableभाज्या