शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

१० हजार बालकांचे पहिलीत पाऊल

By admin | Updated: June 26, 2016 01:08 IST

२७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.

स्वागताची तयारी सुरू : ४ हजार ८७० विद्यार्थिनी; गळती थांबविण्याचे निर्देशगडचिरोली : २७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. लहान बालक बोलायला लागल्यानंतर जवळपास वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच शिक्षणाचे थोडेफार धडेही दिले जातात. मात्र प्रत्यक्षात शिक्षण पहिल्या वर्गापासूनच सुरूवात होते. शाळेमध्ये पहिल्यांदाच बालक जात असल्याने पालक वर्गामध्ये उत्सुकता राहते. प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या गोळा केली आहे. यामध्ये चालू सत्रासाठी सुमारे ९ हजार ८२० विद्यार्थी दाखल होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६३ विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे ४ हजार ४६६ विद्यार्थी, विमुक्त भटक्या जमातीचे १ हजार ४३, इतर मागास वर्गातील २ हजार ६९४, अल्पसंख्यांक समाजाचे ५२ विद्यार्थी व बिगर मागास प्रवर्गाचे ५०२ विद्यार्थी आहेत. दाखलपात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ४ हजार ९५० तर मुलींची संख्या ४ हजार ८७० एवढी आहे. उन्हाळाभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये दाखल केले आहे. शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, याचीही खबरदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)८७५ शाळाबाह्य विद्यार्थी आढळलेशिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळ्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ८७५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यामध्ये ४३२ मुले व ४४३ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गात दाखल केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५२, आरमोरी ७, धानोरा ९४, चामोर्शी १२, अहेरी ६१, एटापल्ली १६७, सिरोंचा ११६, मुलचेरा ५, कोरची ३७, भामरागड २५६, देसाईगंज १६, कुरखेडा तालुक्यात ५२ विद्यार्थी आढळून आले. अधिकारी, पदाधिकारी करणार नवागतांचे स्वागतशाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केले जाणार आहे. कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणत्या शाळेमध्ये जावे, याचे नियोजन शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर सभा घेऊन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी गावातून रॅलीसुध्दा काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवादविद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम मुख्यमंत्री सुध्दा करणार आहेत. भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेत एक ते पाच वर्ग आहेत. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सदर विद्यार्थी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सेंटरमधून मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.