पाऊण तासात येणार पहिल्या फेरीचा कौल

By Admin | Updated: October 18, 2014 23:24 IST2014-10-18T23:24:01+5:302014-10-18T23:24:01+5:30

सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा कौल अवघ्या ४५ मिनिटात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल दुपारी १ वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे.

The first round will take place in 30 hours | पाऊण तासात येणार पहिल्या फेरीचा कौल

पाऊण तासात येणार पहिल्या फेरीचा कौल

गडचिरोली : सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा कौल अवघ्या ४५ मिनिटात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल दुपारी १ वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत.
आरमोरीची मतमोजणी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर गडचिरोलीची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी नागेपल्लीस्थित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. या तिनही मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी काम करणार आहे. याशिवाय पोस्टर मतपत्रिका मोजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. साधारण एका फेरीला एका टेबलवर १ हजार मतांची मोजणी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीचा कौल हा ४५ मिनीटात येईल, असे प्रशासकीय सुत्रांचे म्हणणे आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १ लाख ७१ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. गडचिरोली क्षेत्रात १ लाख ६१ हजार ३७० तर अहेरी क्षेत्रात १ लाख ५० हजार ७४८ मतदान झाले आहे. त्यामुळे साधारणत: दुपारी १ वाजेपर्यंत या संपूर्ण मतांची मोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होईल. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही येथे तैनात करण्यात आले आहे. तीनही विधानसभा मतदार संघात केंद्रीय निवडणूक निरीक्षक जबाबदारी सांभाळून आहेत. उद्या मतमोजणीत तीन विधानसभा क्षेत्रातील ३६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The first round will take place in 30 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.