रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमे जिल्ह्यात प्रथम
By Admin | Updated: June 9, 2015 02:06 IST2015-06-09T02:06:11+5:302015-06-09T02:06:11+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची

रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमे जिल्ह्यात प्रथम
जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के : १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण; १ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य; २ हजार २३५ विद्यार्थी नापास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीची पल्लवी मुकूंदा किरमे या दोन विद्यार्थिनी प्रथम आल्या आहेत. दोघीनाही ९६.६० टक्के गुण आहे.
जिल्ह्यातून १६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. १६ हजार २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १२९ विद्यार्थी प्राविण्यासह ४ हजार ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ७१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ८०५ विद्यार्थी साधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८६.२३ आहे. जिल्ह्यातून ९६.२० टक्के गुण घेऊन सेंट फ्रान्सीस हायस्कूल नागेपल्लीची संजना गुंडावार ही विद्यार्थिनी दुसरी आली आहे. तर ९६ टक्के गुण घेऊन प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोलीचा पियुष अलोणे व डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची श्रेया देविकार हे अनुक्रम तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचा अभिनव अरूण मुनघाटे हा ९५.८० टक्के गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. तर याच शाळेची पूर्वा बुटे ही ९५.६० टक्के गुण घेऊन पाचव्या स्थानावर आहे. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेचा देवांग सिडाम हा विद्यार्थी ९५.२० टक्के गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. यंदा जिल्ह्यात २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल भगवंतराव हायस्कूल ठाकरी इल्लूर ता. चामोर्शीचा ४२.८५ टक्के लागला आहे. १०० टक्के निकालांच्या शाळांमध्ये सात खासगी अनुदानित व शासकीय अनुदानित आश्रमशाळांचाही समावेश आहे. यामध्ये गडचिरोली शहरातील दोन शाळांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ९१.५ टक्के निकाल भामरागड तालुक्याचा असून सर्वात कमी ८४.७ टक्के निकाल धानोरा तालुक्याचा आहे.
पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६३.०७ टक्के
४गडचिरोली जिल्ह्यातून १ हजार ११७ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी सहा विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा निकाल ६३.०७ टक्के लागला आहे.
निकालाच्या टक्केवारी मुलांची आघाडी
४गडचिरोली जिल्ह्यातून १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७ हजार १६८ मुले व ६ हजार ८६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच मुलांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.२५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे. मुलींचे परीक्षेला बसण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढलेली आहे.