शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

आगीमुळे जैवविविधता उद्यानाचे आरमोरीकरांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या ...

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आरमोरी व परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी आरमोरीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. तांबटकर यांच्या कार्यकाळात आरमोरी देसाईगंज रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. तांबटकर यांच्या काळात या उद्यानाची अनेक कामे जलदगतीने मार्गी लागली. मात्र, ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याबरोबर उद्यानाचे कामही थांबले होते. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्यानाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात फारसे लक्ष दिले नाही.

दुर्लक्षित व रखडलेल्या अवस्थेतील उद्यानाला धूलिवंदनाच्या दिवशी आग लावून त्याची राखरांगोळी करण्यात आली. मात्र, उद्यानाला आग लावणा-या अज्ञात इसमाचा शोध वनविभागाला अद्यापही घेता आला नाही.

प्रत्येक तालुकास्तरावर जैवविविधता उद्यान व्हावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसारच, आरमोरी येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. आरमोरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व नगर परिषदेचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील नागरिकांना काही क्षण निवांतपणे घालविण्यासाठी, फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी शहरात कुठलेही उद्यान किंवा बगिचा नाही. त्यामुळे आरमोरीकरांची मोठी घुसमट होत आहे. आरमोरी शहराजवळ एक तरी वनोद्यान व्हावे, ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्या काळात जैवविविधता उद्यानाचे रूप साकारण्यास सुरुवात झाली होती. आरमोरी येथे जागेची पाहणी करून जैवविविधता उद्यान उभे करण्यासाठी उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधीची मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात वडसा रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यास सुरुवात झाली. वनोद्यानात बांबूची झाडे, विविध प्रकारची फुले, फळे व दुर्मीळ वनौषधींची झाडे, विविध जातीची मौल्यवान झाडे व बगिचाही तयार करण्यात आला होता. मात्र, तांबटकर सेवानिवृत्त झाल्यावर उद्यानाचे काम रखडले होते. त्यानंतर आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जैव विविधता उद्यानाचे रखडलेले उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फारसे लक्ष दिले नाही.

उद्यान तर जाळले. शासनाचे खर्च झालेले लाखो रुपयेही पाण्यात गेले, शिवाय आरमोरीकरांचे उद्यानाचे स्वप्नही भंगले. त्यामुळे जळालेल्या जैवविविधता उद्यानाची आता नव्याने उभारणी होणार काय आणि त्यासाठी वनविभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी आरमोरीकरांचे जैवविविधता वनोद्यानाचे नव्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.