शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

आगीमुळे जैवविविधता उद्यानाचे आरमोरीकरांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या ...

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आरमोरी व परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी आरमोरीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. तांबटकर यांच्या कार्यकाळात आरमोरी देसाईगंज रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. तांबटकर यांच्या काळात या उद्यानाची अनेक कामे जलदगतीने मार्गी लागली. मात्र, ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याबरोबर उद्यानाचे कामही थांबले होते. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्यानाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात फारसे लक्ष दिले नाही.

दुर्लक्षित व रखडलेल्या अवस्थेतील उद्यानाला धूलिवंदनाच्या दिवशी आग लावून त्याची राखरांगोळी करण्यात आली. मात्र, उद्यानाला आग लावणा-या अज्ञात इसमाचा शोध वनविभागाला अद्यापही घेता आला नाही.

प्रत्येक तालुकास्तरावर जैवविविधता उद्यान व्हावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसारच, आरमोरी येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. आरमोरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व नगर परिषदेचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील नागरिकांना काही क्षण निवांतपणे घालविण्यासाठी, फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी शहरात कुठलेही उद्यान किंवा बगिचा नाही. त्यामुळे आरमोरीकरांची मोठी घुसमट होत आहे. आरमोरी शहराजवळ एक तरी वनोद्यान व्हावे, ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्या काळात जैवविविधता उद्यानाचे रूप साकारण्यास सुरुवात झाली होती. आरमोरी येथे जागेची पाहणी करून जैवविविधता उद्यान उभे करण्यासाठी उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधीची मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात वडसा रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यास सुरुवात झाली. वनोद्यानात बांबूची झाडे, विविध प्रकारची फुले, फळे व दुर्मीळ वनौषधींची झाडे, विविध जातीची मौल्यवान झाडे व बगिचाही तयार करण्यात आला होता. मात्र, तांबटकर सेवानिवृत्त झाल्यावर उद्यानाचे काम रखडले होते. त्यानंतर आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जैव विविधता उद्यानाचे रखडलेले उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फारसे लक्ष दिले नाही.

उद्यान तर जाळले. शासनाचे खर्च झालेले लाखो रुपयेही पाण्यात गेले, शिवाय आरमोरीकरांचे उद्यानाचे स्वप्नही भंगले. त्यामुळे जळालेल्या जैवविविधता उद्यानाची आता नव्याने उभारणी होणार काय आणि त्यासाठी वनविभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी आरमोरीकरांचे जैवविविधता वनोद्यानाचे नव्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.