शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगीमुळे जैवविविधता उद्यानाचे आरमोरीकरांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या ...

आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आरमोरी व परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी आरमोरीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. तांबटकर यांच्या कार्यकाळात आरमोरी देसाईगंज रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. तांबटकर यांच्या काळात या उद्यानाची अनेक कामे जलदगतीने मार्गी लागली. मात्र, ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याबरोबर उद्यानाचे कामही थांबले होते. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्यानाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात फारसे लक्ष दिले नाही.

दुर्लक्षित व रखडलेल्या अवस्थेतील उद्यानाला धूलिवंदनाच्या दिवशी आग लावून त्याची राखरांगोळी करण्यात आली. मात्र, उद्यानाला आग लावणा-या अज्ञात इसमाचा शोध वनविभागाला अद्यापही घेता आला नाही.

प्रत्येक तालुकास्तरावर जैवविविधता उद्यान व्हावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसारच, आरमोरी येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. आरमोरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व नगर परिषदेचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील नागरिकांना काही क्षण निवांतपणे घालविण्यासाठी, फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी शहरात कुठलेही उद्यान किंवा बगिचा नाही. त्यामुळे आरमोरीकरांची मोठी घुसमट होत आहे. आरमोरी शहराजवळ एक तरी वनोद्यान व्हावे, ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्या काळात जैवविविधता उद्यानाचे रूप साकारण्यास सुरुवात झाली होती. आरमोरी येथे जागेची पाहणी करून जैवविविधता उद्यान उभे करण्यासाठी उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधीची मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात वडसा रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यास सुरुवात झाली. वनोद्यानात बांबूची झाडे, विविध प्रकारची फुले, फळे व दुर्मीळ वनौषधींची झाडे, विविध जातीची मौल्यवान झाडे व बगिचाही तयार करण्यात आला होता. मात्र, तांबटकर सेवानिवृत्त झाल्यावर उद्यानाचे काम रखडले होते. त्यानंतर आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जैव विविधता उद्यानाचे रखडलेले उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फारसे लक्ष दिले नाही.

उद्यान तर जाळले. शासनाचे खर्च झालेले लाखो रुपयेही पाण्यात गेले, शिवाय आरमोरीकरांचे उद्यानाचे स्वप्नही भंगले. त्यामुळे जळालेल्या जैवविविधता उद्यानाची आता नव्याने उभारणी होणार काय आणि त्यासाठी वनविभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी आरमोरीकरांचे जैवविविधता वनोद्यानाचे नव्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.