गावातच उपलब्ध होणार खत व बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:09+5:30
पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.

गावातच उपलब्ध होणार खत व बियाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांची खत व बियाणांच्या दुकानामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी गाव पातळीवर खत व बियाणे उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली कृषी विभाग नियोजन करीत आहे.
पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच खते व बियाणे उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांनी दिले आहेत.
कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी हे शेतकºयांना ग्रामस्तरावरच खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल. गावस्तरावरील शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी तर्फे गावातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खत व बियाणांची मागणी समितीकडे नोंदवेल. तालुका कृषी अधिकारी खताची किंमत निश्चित करतील. खत व बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले पैसे शेतकरी गट आरटीजीएस किंवा डीडीद्वारे खत विक्रेत्याला देतील. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी पैसे डीडी किंवा आरटीजीएसने देणे सक्तीचे राहणार आहे. गावात एकाच ठिकाणी खत उतरविले जाईल. तेथून शेतकरी आपल्या घरी खत घेऊन जातील. खताची मूळ किंमत वाहतूक खर्च, हमाली या सर्वांचा खर्च शेतकऱ्यांना भरावा लागेल. या सर्व प्रक्रियेमुळे दुकानात गर्दी होणार नाही. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीतच खत व बियाणांचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व्यवहार शेतकरी गटच सांभाळेल
शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करणे, या पैशाची डीडी बनविणे हे सर्व व्यवहार गावातील शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच करेल. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हस्तक्षेप करणार नाही. खताची मूळ किंमत, वाहतूक खर्च, हमालीसह खताची एकूण किंमत ठरविली जाईल. तेवढे पैसे डीडी किंवा आरटीजीएस स्वरूपात दुकानदाराला दिले जाणार आहे.