शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एफडीसीएमच्या जंगलताेडीमुळे वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:26 IST

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील अधिक घनतेचे असलेले शिरपूर जंगल वनविभागाने एफडीसीएमला हस्तांतरित केल्यानंतर मागील १०-१२ वर्षांपासून येथे जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे वन्य जीवांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीव रस्त्यावर, मोकळ्या जागेत आश्रय घेत आहेत. यातून अवैधरित्या त्यांची शिकार हाेत आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, सालमारा, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावरखेडा वाढाेणा, वडसा तालुक्यातील चिखली (रिठ) येथील जास्त घनतेचे जंगल वनविभागाने एफडीसीएमकडे वर्ग केला. तेव्हापासून या तालुक्यातील जास्त घनतेच्या जंगलांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, शिवाय वन्य जीवांचा निवारा हिरावला जाताे.

शिरपूर, सावरखेडा, वैरागड या जंगलात हरीण, नीलगाय, ससा व अन्य तृणभक्षी, प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. येथे विविध प्रजातींचे पक्षीही हाेते. सध्या ही संख्या राेडावली आहे. वृक्षताेडीमुळे मोकळ्या जागी येणाऱ्या प्राण्यांची शिकार होऊ लागली.

सागवान राेपण अयशस्वी

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस झेलून उभे असलेले वनवैभव नष्ट करून त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

मागील १० वर्षांत लावलेले सागवान रोपे यशस्वी झाले नाहीत. वनविभागाने वर्ग केलेल्या जास्त घनतेच्या जंगलांची अशीच कत्तल होत राहिल्यास वनांची आणि वन्य जीवांची मोठ्या प्रमाणात हानी हाेऊ शकते. त्यामुळे वनविभागाने जंगल एफडीसीएमकडे वर्ग करू नये, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवforestजंगल