शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएमच्या जंगलताेडीमुळे वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:26 IST

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील अधिक घनतेचे असलेले शिरपूर जंगल वनविभागाने एफडीसीएमला हस्तांतरित केल्यानंतर मागील १०-१२ वर्षांपासून येथे जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे वन्य जीवांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीव रस्त्यावर, मोकळ्या जागेत आश्रय घेत आहेत. यातून अवैधरित्या त्यांची शिकार हाेत आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, सालमारा, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावरखेडा वाढाेणा, वडसा तालुक्यातील चिखली (रिठ) येथील जास्त घनतेचे जंगल वनविभागाने एफडीसीएमकडे वर्ग केला. तेव्हापासून या तालुक्यातील जास्त घनतेच्या जंगलांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, शिवाय वन्य जीवांचा निवारा हिरावला जाताे.

शिरपूर, सावरखेडा, वैरागड या जंगलात हरीण, नीलगाय, ससा व अन्य तृणभक्षी, प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. येथे विविध प्रजातींचे पक्षीही हाेते. सध्या ही संख्या राेडावली आहे. वृक्षताेडीमुळे मोकळ्या जागी येणाऱ्या प्राण्यांची शिकार होऊ लागली.

सागवान राेपण अयशस्वी

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस झेलून उभे असलेले वनवैभव नष्ट करून त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

मागील १० वर्षांत लावलेले सागवान रोपे यशस्वी झाले नाहीत. वनविभागाने वर्ग केलेल्या जास्त घनतेच्या जंगलांची अशीच कत्तल होत राहिल्यास वनांची आणि वन्य जीवांची मोठ्या प्रमाणात हानी हाेऊ शकते. त्यामुळे वनविभागाने जंगल एफडीसीएमकडे वर्ग करू नये, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवforestजंगल