शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

एफडीसीएमच्या जंगलताेडीमुळे वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:26 IST

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील अधिक घनतेचे असलेले शिरपूर जंगल वनविभागाने एफडीसीएमला हस्तांतरित केल्यानंतर मागील १०-१२ वर्षांपासून येथे जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे वन्य जीवांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीव रस्त्यावर, मोकळ्या जागेत आश्रय घेत आहेत. यातून अवैधरित्या त्यांची शिकार हाेत आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, सालमारा, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावरखेडा वाढाेणा, वडसा तालुक्यातील चिखली (रिठ) येथील जास्त घनतेचे जंगल वनविभागाने एफडीसीएमकडे वर्ग केला. तेव्हापासून या तालुक्यातील जास्त घनतेच्या जंगलांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, शिवाय वन्य जीवांचा निवारा हिरावला जाताे.

शिरपूर, सावरखेडा, वैरागड या जंगलात हरीण, नीलगाय, ससा व अन्य तृणभक्षी, प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. येथे विविध प्रजातींचे पक्षीही हाेते. सध्या ही संख्या राेडावली आहे. वृक्षताेडीमुळे मोकळ्या जागी येणाऱ्या प्राण्यांची शिकार होऊ लागली.

सागवान राेपण अयशस्वी

नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस झेलून उभे असलेले वनवैभव नष्ट करून त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे.

मागील १० वर्षांत लावलेले सागवान रोपे यशस्वी झाले नाहीत. वनविभागाने वर्ग केलेल्या जास्त घनतेच्या जंगलांची अशीच कत्तल होत राहिल्यास वनांची आणि वन्य जीवांची मोठ्या प्रमाणात हानी हाेऊ शकते. त्यामुळे वनविभागाने जंगल एफडीसीएमकडे वर्ग करू नये, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवforestजंगल