शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य विलास कोरेटी, कृषी सहायक विकेश मडावी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देतंत्रज्ञान व्यवस्थापकांचे प्रतिपादन : येरकड येथे शेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानाची शेती ही खरीप हंगामातील सहा महिने कालावधीची शेती आहे. उर्वरित सहा महिने जमीन पडीत असते. शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दुबार पीक लागवड करणे आवश्यक आहे. धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायावर भर द्यावा, असे प्रतिपादन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांनी केले.पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य विलास कोरेटी, कृषी सहायक विकेश मडावी आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेवगा पिकाची निवड करून रोपे उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्यानंतर आत्मा व कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळेत शेवगा लागवड करणे, पाणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग तसेच विक्री व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.आत्मा, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धानोरा तालुक्याच्या अनेक गावात शेतकºयांची शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेत धानासोबतच विविध पिकांची लागवड पद्धती, रोग व कीड व्यवस्थापन, बियाणे, खतांचा वापर आदीसह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.उपयुक्त शेवग्यामध्ये औषधी गुणधर्मशेवगा हे बहुआयामी औषधी गुणधर्म असलेले पीक आहे. शेवग्याच्या शेंगा, पाने व बिया उपयुक्त आहेत. शेवग्याच्या बियापासून तेल तयार करण्यात येत असून त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. शेवग्याच्या झाडाच्या पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण दूर करण्यासाठी पोषक आहार म्हणून करण्यात येतो. बियांची पावडर पाणी शुध्दीकरण करण्यासाठी करण्यात येते तर शेंगा ह्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे पीक वर्षातून दोनदा घेतल्या जाते. पीक हलक्या जमिनीमध्ये घेतले जात असून या पिकास पाणी खूप कमी प्रमाणामध्ये लागत असल्याने माळरानाच्या ठिकाणीसुद्धा शेवगाचे पीक घेता येऊ शकते. या पिकाच्या लागवडीसाठी खर्च बराच कमी येत असून उत्पन्न अधिक आहे. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते, असे या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती