शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाळवंटी टोळीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:00 AM

वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचे आवाहन : जिल्ह्यात मोठ्या नुकसानीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात थैमान घातलेली वाळवंटी टोळ (नाकतोडे) महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहून या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.बी.उंदीरवाडे यांनी केले आहे.वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.यावर्षी या किडीने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच १५ दिवसानंतर खरिपाच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. या कालावधीत सदर वाळवंटी टोळ जिल्ह्यात आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांतच खरीप हंगामातील धान पऱ्हे टाकण्याच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वाळवंटी टोळचा जीवनक्रमअंडी अवस्था :-वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये १० ते १५ सेमी खोलात टाकते. एक मादी जवळपास १५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमान व आद्रतेवर अवलंबून राहते. साधारणपणे १० ते १२ दिवसांत अंडी उबवतात.पिल्ले :-अंडी उबवल्यानंतर यातून पिल्ले बाहेर पडतात. सुरूवातीच्या अवस्थेत पिल्ल्यांना पंख नसतात. या पिल्ल्यांच्या पाच अवस्था आढळतात. तापमान जर ३७ अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तर २२ दिवसांत पिल्लांची अवस्था पूर्ण होते. तापमान कमी असेल तर ७० दिवस लागतात.प्रौढ :-पाचव्या अवस्थेतील पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. हीच अवस्था सर्वाधिक नुकसानकारक ठरते. थंड वातावरणात ही कीड जवळपास आठ महिन्यांपर्यंत जिवंत राहते. अन्नाच्या शोधात प्रौढ टोळ हवेच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जातात. त्यामुळे अधिकाधिक शेतातील पिकांपर्यंत पोहोचून ते पीक फस्त करतात. प्रौढ टोळ मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असते.टोळ किडीचे व्यवस्थापनशेतात टोळ आल्यास शेतकऱ्यांनी वाद्य वाजवावे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुपूपांवर टोेळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवाव्या. टायर जाळून धूर करावा. पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भातामध्ये फिप्रोनील ५ एससी, ३ मिली मिसळावे. त्याचे ढीग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. सदर अन्न खाल्ल्यानंतर कीड मरण पावते. टोळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी टोळ विश्रांतीसाठी झाडाझुडूूपांवर बसून राहते. या कालावधीत फवारणी केल्यास टोळीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांनी फवारणी करू नये.

टॅग्स :agricultureशेती