शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:13 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरात्रीपासून सरीवर सरी : करपण्याच्या स्थितीतील पºह्यांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बाराही तालुक्यात २४ तासात सरासरी १३.४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी, अहेरी उपविभाग तसेच आरमोरी, वडसा, धानोरा ते कोरचीपर्यंत पाऊस बरसला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता.वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिला भर पावसात घराबाहेर पडल्या. पावसातच त्यांनी विनातक्रार वडाच्या झाडाची पुजा केली.अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपल्या शेतजमिनीत नांगरणी करून रोवणीयोग्य केली आहे. शेताच्या बांधावर पाळे टाकून तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. या पावसामुळे तूर व तिळाचे अंकूरही बाहेर निघाले आहेत. एकूणच सदर संततधार पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. वातावरणातील उकाडाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.धानपिकाचे पऱ्हे टाकल्याला आठ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. २७ जून रोजी सकाळपासून दुपारपर्यंत आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नव्हता. या भागातील अनेक ठिकाणचे पऱ्हे करपायला लागले होते. पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली होती. दरम्यान बुधवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रोवणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावात अंतर्गत रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाल्या पाण्याने वाहत आहेत. संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोवणीस होणार सुरूवातसंततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचले असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग आता खत जुळविणीपासून रोवणीच्या तयारीच्या कामाला जोमाने भिडला आहे. हा पाऊस दोन दिवस कायम राहिल्यास येत्या लवकरच जिल्ह्यात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी