शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:13 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरात्रीपासून सरीवर सरी : करपण्याच्या स्थितीतील पºह्यांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बाराही तालुक्यात २४ तासात सरासरी १३.४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी, अहेरी उपविभाग तसेच आरमोरी, वडसा, धानोरा ते कोरचीपर्यंत पाऊस बरसला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता.वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिला भर पावसात घराबाहेर पडल्या. पावसातच त्यांनी विनातक्रार वडाच्या झाडाची पुजा केली.अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपल्या शेतजमिनीत नांगरणी करून रोवणीयोग्य केली आहे. शेताच्या बांधावर पाळे टाकून तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. या पावसामुळे तूर व तिळाचे अंकूरही बाहेर निघाले आहेत. एकूणच सदर संततधार पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. वातावरणातील उकाडाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.धानपिकाचे पऱ्हे टाकल्याला आठ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. २७ जून रोजी सकाळपासून दुपारपर्यंत आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नव्हता. या भागातील अनेक ठिकाणचे पऱ्हे करपायला लागले होते. पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली होती. दरम्यान बुधवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रोवणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावात अंतर्गत रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाल्या पाण्याने वाहत आहेत. संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोवणीस होणार सुरूवातसंततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचले असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग आता खत जुळविणीपासून रोवणीच्या तयारीच्या कामाला जोमाने भिडला आहे. हा पाऊस दोन दिवस कायम राहिल्यास येत्या लवकरच जिल्ह्यात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी