शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:13 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरात्रीपासून सरीवर सरी : करपण्याच्या स्थितीतील पºह्यांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बाराही तालुक्यात २४ तासात सरासरी १३.४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे.गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी, अहेरी उपविभाग तसेच आरमोरी, वडसा, धानोरा ते कोरचीपर्यंत पाऊस बरसला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता.वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिला भर पावसात घराबाहेर पडल्या. पावसातच त्यांनी विनातक्रार वडाच्या झाडाची पुजा केली.अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे आपल्या शेतजमिनीत नांगरणी करून रोवणीयोग्य केली आहे. शेताच्या बांधावर पाळे टाकून तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. या पावसामुळे तूर व तिळाचे अंकूरही बाहेर निघाले आहेत. एकूणच सदर संततधार पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. वातावरणातील उकाडाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.धानपिकाचे पऱ्हे टाकल्याला आठ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. २७ जून रोजी सकाळपासून दुपारपर्यंत आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नव्हता. या भागातील अनेक ठिकाणचे पऱ्हे करपायला लागले होते. पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली होती. दरम्यान बुधवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रोवणीच्या कामास सुरुवात होणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावात अंतर्गत रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील नाल्या पाण्याने वाहत आहेत. संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोवणीस होणार सुरूवातसंततधार पावसाने शेतशिवारात पाणी साचले असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग आता खत जुळविणीपासून रोवणीच्या तयारीच्या कामाला जोमाने भिडला आहे. हा पाऊस दोन दिवस कायम राहिल्यास येत्या लवकरच जिल्ह्यात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी