शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:30 IST

सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा यावर्षी १२ क्विंटलवरून ९.६० ...

सिरोंचा : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा यावर्षी १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना उर्वरित धान विक्री करण्याची वेळ आली आहे. शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.

सिराेंचा तालुक्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकरी अद्यापही धान घेऊन गेले नाहीत. केंद्राकडे अद्यापही शेतकऱ्यांनी पाठच फिरविली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुडेवार यांनी गुरुवारी अमरावती येथील केंद्राला भेट देऊन नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करावी, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली, परंतु शेतकऱ्यांनी धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटलपर्यंत वाढवावी. खरेदीची मर्यादा न वाढविल्यास आधारभूत केंद्रावर धान विक्री करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच धान खरेदी करण्याची मर्यादा अद्याप न वाढविल्याने महामंडळ व सरकरप्रति तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्राला भेट देऊन धान खरेदीबाबत माहिती घेतली असता एकाही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केल्याचे दिसून आले नाही. यापूर्वी नारायणपूर व परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी महामंडळ व सरकारने काढलेल्या एकरी ९ क्विंटल ६० किलो धान खरेदी करण्याचा आदेश मागे घ्यावा तसेच अट रद्द करून एकरी किमान २० ते २५ क्विंटल धान खरेदी करण्यात यावी म्हणून चक्काजाम आंदोलन केले व निवेदने देऊन धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली हाेती.

बाॅक्स

अनेकांचे धान शेतातच पडून

आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकरी २० क्विंटलपर्यंत धान खरेदी करावी, या मागणीवर शासनाकडून तोडगा न निघाल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. राज्य सरकार व महामंडळाने तत्काळ योग्य निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.