शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

शेतकरी व पशुधन वन्यप्राण्यांच्या दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली ...

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली प्राण्यांच्या दहशतीत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात वन्यप्राण्यांच्या ४२ घटना नागभीड वनपरिक्षेत्रातच घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षापूर्वी तळोधी ( बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी,जनकापूर, बाळापूर, देवपायली,बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, मिंडाळा, नवेगाव हुंडेश्वरी,मौशी, ढोरपा, बालापूर खूर्द, पाहार्णी, म्हसली,कोरंबी,डोंगरगाव, नवखळा आदी परिसर तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दावसाढवळ्या दर्शन झाले आहे. अनेकांच्या शेती या जंगलाला लागून आहेत. या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. त्यामुळे वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.आतापर्यंत असे झाले हल्लेनागभीड वनपरिक्षेत्रात एप्रिल महिन्यापासून १४ व्यक्तींवर रानटी डुकरांनी हल्ले केले आहेत. दोन व्यक्तींवर बिबट्यांनी तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २६ जनावरे जखमी व मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती आहे. या घटना केवळ घटनाच नाही तर या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधन मृत्यूमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. 

तळोधी वनपरिक्षेत्र संवेदनशीलनागभीड वनपरिक्षेत्राच्या तुलनेत तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील आहे. गेल्या चार महिन्यात या वनपरिक्षेत्रात वाघाने थेट व्यक्तींवर हल्ला करून ठार केल्याच्या चार घटना आहेत. यात कोजबी माल येथील सरपणासाठी गेलेला व्यक्ती, मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेली महिला आणि आकापूर व वाढोणा येथील दोन गुराख्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रातही अन्य वन्य प्राण्यांकडून पशूधनावर, व्यक्तींवर हल्ला करून ठार किंवा जखमी केल्याच्या अनेक घटना आहेत.मात्र या घटनांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ