योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: June 7, 2015 01:59 IST2015-06-07T01:59:17+5:302015-06-07T01:59:17+5:30
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा
किसन नागदेवे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे जनकल्याण पर्व कार्यक्रम
देसाईगंज : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले आहे.
देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी जनकल्याण पर्व व महासंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नाना नाकाडे, चांगदेव फाये, नगराध्यक्ष श्याम उईके, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, आशा राऊत, शांताबाई तितीरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी ग्राम पंचायत निवडणुकीत विजय संपाद करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना किसन नागदेवे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्य मार्गाचे अनेक काम प्रस्तावित केले आहेत. युरिया खतावरील दरवाढ कपात केल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर आहे. घरकूल योजना, जन-धन योजना, बेटी सुरक्षा योजना अशा अनेक योजना कार्यान्वित करून जनतेला विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
जनतेने भाजपावर विश्वास ठेवत केंद्रात व राज्यातील सत्ता हाती दिली आहे. या विश्वाला तडा जाऊ न देता सरकारने अनेक विकासात्मक काम केले आहे. हे सर्व कामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे काम असल्याचे प्रतिपादन केले. संचालन राजरतन मेश्राम यांनी केले.