महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: August 18, 2016 01:31 IST2016-08-18T01:31:57+5:302016-08-18T01:31:57+5:30

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Extend revenue and agriculture plans to the village | महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

 चर्चा : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर योजना गावागावापर्यंत पोहोचवाव्या, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिल्या.
सोमवारी अहेरीचे एसडीओ एस. राममूर्ती यांच्या दालनात विविध योजना व विकास कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आलापल्ली हे मोठे वनग्राम १९७८-७९ मध्ये महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात आले. मात्र या गावातील नागरिकांना व व्यावसायिकांना अस्थायी पट्टे स्थायी करून देण्यात आले नाही, असे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
याप्रसंगी एसडीओ एस. राममूर्ती, तहसीलदार जी. टी. पुरके, बीडीओ सुनील तडस, ठाणेदार संजय मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अण्णपूर्णा सिडाम, नगरसेवक व पत्रकार उपस्थित होते.

Web Title: Extend revenue and agriculture plans to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.