शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास कार्यक्रमावर वर्षभरात १५.३३ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:53 IST

देशातील ११५ मागास जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये २४ कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

ठळक मुद्दे२४.९६ कोटींची प्रशासकीय मान्यता : मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील ११५ मागास जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये २४ कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तो सर्व निधी कार्यान्वयिन यंत्रणांना वितरितही केला, पण त्यापैकी १५ कोटी ३३ लाखांचा निधी (६१.४४ टक्के) प्रत्यक्षात खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यात देसाईगंज हा एकमेव तालुका प्रगत समजला जातो. त्यामुळे इतर सर्व तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रशिक्षण, साहित्य पुरवठ्यासारख्या योजना, शेतकऱ्यांना कृषीपयोगी साहित्य वाटप, आरोग्यविषयक शिबिरे, विद्यार्थिनींना शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्कूल बस यासारखे उपक्रम राबविले जातात.एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यासाठीची शिबिरे घेण्यासाठी १ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर होता. प्रत्यक्षात १९० शिबिरांवर २८ लाखांचा खर्च करून १७.७३ टक्के उद्दीष्ट गाठण्यात आले. अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील बाळंत महिलांना बुडीत मजुरी देण्यासाठी ४ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर होता. प्रत्यक्षात १ कोटी ५७ लाखांचा निधी खर्च झाला.कस्तुरबा गांधी बालिका योजना, मोठ्या गावातील माध्यमिक शाळांत अभ्यासिकांची सुविधा, बचत गटाकरिता मोती प्रकल्प विकास व प्रचार, शेतकरी गटास मिनी मोबाईल राईस मिल, चिखलणी व गवत कापणी यंत्र देणे, संयुक्त धान कापणी व मळणी यंत्र प्रशिक्षण, बांबू व इतर वनोपजांपासून वस्तू निर्मिती प्रकल्प उभारणे, प्रशिक्षण तथा प्रचार-प्रसार आदींवरील मंजूर निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. विशेष म्हणजे सर्व निधी उपयोगी लावताना संबंधित यंत्रणांचीच मदत घ्यावी लागते. परंतू काही यंत्रणा या कामात योग्य ते सहकार्य करीत नसल्याचा अनुभव येत असल्यामुळे प्रशासनाला हतबल व्हावे लागत आहे.विद्यार्थिनींच्या स्कूल बसवर ५.३५ कोटी खर्चवर्षभरातील एकूण खर्चात सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणि शाळेतून गावापर्यंत सोडणाºया स्कूल बसेसवर खर्च झाला आहे. त्यासाठी ११ तालुक्यांत एसटी महामंडळाच्या निळ्या रंगाच्या बसेस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता त्यांना या बसेसमधून उच्च माध्यमिक शाळेची सोय असणाºया गावापर्यंत मोफत प्रवास घडविला जातो. परंतू गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बस जाण्याइतपत मार्गच नसल्यामुळे त्या गावातील मुलींना सायकलने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातही पावसाळ्यात मार्ग बंद झाल्यानंतर शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताच पर्याय नसतो.रोजगार निर्मितीच्या योजनांवरील खर्च ‘शून्य’आरमोरी तालुक्यात टसर रेशिम धागा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी १२ लाख ५० हजारांचा निधी मंजूर होता. परंतू त्यावर कोणताही खर्च झाला नाही. रोजगार निर्मितीसाठी मोहफूल लाडू, मोह चिक्की उद्योग व प्रक्रिया केंद्र सुरू करणे, हळद, मिरची, मसाले विक्री, पॅकेजिंग व्यवसाय करणे, रताळापासून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करणे, दूध संकलन व प्रक्रिया केंद्र सुरू करणे, सगुणा पीक लागवड तंत्रज्ञान (भात शेती) प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, १०० शेळी गटाचे (१० शेळी व १ बोकड) वाटप करणे, मांसल कुक्कूट पालनासाठी शेड बांधकाम करणे, मोहफुलांचे संकलन करण्यासाठी १० संयुक्त व्यवस्थापन समितींना ३ सौर यंत्रे, ५० जाळ्या व साठवणूक गृहाची सुविधा देणे, महिला बचत गटांना बायोमास पॅलेट मशिनचे वाटप, फुलवात बनविण्याच्या मशिनचे वाटप, शतावरी कल्प व शतावरी पावडर तयार करणे, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मत्स्यखाद्य, मासेमारी जाळे व मासे सुरक्षित वाहतुकीसाठी प्लास्टिक क्रेट व ई-रिक्षा पुरवठा करणे, बेरोजगारांना ई-आॅटोरिक्षा पुरवठा करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्यांना स्वयंरोजगारासाठी टूल किट्स उपलब्ध करणे आदी योजनांसाठी एकूण ५ कोटी ६० लाख ८५ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतू त्यातील एक रुपयाही खर्च झाला नाही.