शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

आपला आजार जर नियंत्रित ‌अवस्थेत असेल तर कोरोनाची लस घेतलीच पाहिजे, त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस, महसूल कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांपैकी सात हजाराच्या घरात कर्मचाऱ्यांनी लस घेतली.

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला; आजार नियंत्रित असणाऱ्यांना धोका नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचे लसीकरण आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचले असले तरी अनेकजण अजूनही लसीबाबत साशंक आहेत. ही लस आपण घ्यावी की नाही, अशी त्यांची द्विधामन:स्थिती आहे. विशेषत: जुन्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना लस घेतल्यानंतर काही रिॲक्शन तर येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे. आपला आजार जर नियंत्रित ‌अवस्थेत असेल तर कोरोनाची लस घेतलीच पाहिजे, त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस, महसूल कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांपैकी सात हजाराच्या घरात कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात १८ फेब्रुवारीपासून शिक्षक, पत्रकारांसह ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारग्रस्त ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यातील १४ हजार लोकांपैकी ५७६५ जणांनी आतापर्यंत लस घेतली. परंतु अजूनही बरेच नागरिक लस घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत.लस आली त्याच्या सुरुवातीच्या काळात रिॲक्शन आल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या होत्या. परंतु गडचिरोली जिल्ह्यात अजून लसीमुळे कोणाची प्रकृती फारशी गंभीर झाल्याचे उदाहरण नाही. केवळ एका रुग्णाची प्रकृती बिघडली होती; पण नंतर तो रुग्णही बरा झाला. हृदयरोग, अस्थमा, किडनीचे विकार, मधुमेह अशा कोणत्याही आजाराच्या रुग्णाला ही लस घेता येते, असे डॉक्टर सांगतात.

कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जुन्या आजाराबद्दल विचारले जाते. अनेकजण आजाराची फाइल घेऊन येतात. ती पाहुन आणि रुग्णाची तपासणी करून लसीबाबत निर्णय घेतला जाताे. बायपास झालेले किंवा अँजिओप्लास्टी झालेले तर अनेकजण आतापर्यंत येऊन लस घेऊन गेले. कोणावर काही दुष्परिणाम झालेला नाही.- डॉ.आय.जी. नागदेवतेहृदयरोग तज्ज्ञ

सध्या ४५ पेक्षा अधिक वयाच्या व्याधीग्रस्तांना लसीकरणात प्राधान्य दिले जात आहे. आता घरोघरी मधुमेहाचे रुग्ण आढळतात. सरासरी ब्लड शुगर २०० च्या आत असेल तर त्या व्यक्तीला लस घेण्यात काहीच अडचण नाही. ज्या व्याधीने ग्रस्त आहे त्यासंबंधीची औषधी सुरू असेल तरी चालेल, फक्त ती व्याधी नियंत्रणात असेल तर कोरोनाची लस घेता येते.- डॉ.मिलिंद धुर्वेमधुमेह तज्ज्ञ

थंडी-ताप आला तरी घाबरू नयेकोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर काही वेळानंतर थंडी वाजणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसतात. पण अशी लक्षणेही सर्वच रुग्णांमध्ये आढळत नाही. ही लक्षणे आढळली तरी त्यात घाबरण्यासारखे काहीच नसून साधी तापाची गोळी घेतल्यानंतर ताप उतरून प्रकृती नॉर्मल होते, असे डॉक्टर सांगतात. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर निरीक्षण कक्षात काही वेळ थांबल्यानंतर तिथेच सर्वांना ताप उतरण्याची गोळी दिली जाते. अनेक जणांवर तर लस घेतल्यानंतर कोणताही परिणाम (रिअक्शन) दिसत नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस