शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 9:34 PM

अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,एसटीचे सुटे भाग उपलब्ध नसणे, डिझेलची कमरता यामुळे गडचिराेली व अहेरी आगारातील २५ टक्के बसेस आगारातच पडून राहतात. यावरून एसटीची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय हाेत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे. प्रवासी देखील तासनतास बसस्टँडवर बसची वाट पाहत  असतात. खासगी वाहनांचे तिकीट दर वाढले असले तरी प्रवाशांना नाईलाजाने त्यांच्याकडेच जावे लागत आहे. 

यांत्रिकांचीही वानवाअहेरी आगारात एकूण ८६ बसेस वाहने आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ७४ यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु आजच्या स्थितीत अहेरी आगारात केवळ २६ यांत्रिक कर्मचारीच आहेत. ६० यांत्रिकी कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. 

पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दैनावस्था कायम -    पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात हाेते. आता मात्र पावसाळा संपला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. -    अहेरीवरून सिराेंचासाठी दिवसातून एकाच बसच्या दाेन फेऱ्या हाेत हाेत्या,आता केवळ एकच फेरी हाेते. दाेन फेऱ्यांसाठी जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ आता एकाच फेरीसाठी लागत असल्याने अधिक प्रमाणात डिझेल लागते. त्यामुळे एसटीचा ताेटा वाढत चालला आहे. 

डिझेलचा खर्चही भरून निघणे कठीणरत्यांच्या दुरवस्थेमुळे एसटीची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी आता दुप्पट कालावधी लागत आहे. तेवढा वेळ बस सुरूच राहत असल्याने दुप्पट डिझेल लागत आहे. प्रवासी मात्र तेवढेच मिळत असल्याने उत्पन्नात वाढ झाली नाही. परिणामी आगाराचा ताेटा वाढत चालला आहे.

बस वेळेवर कशी पाेहाेचणार?अहेरी आगारात मानव विकास मिशनच्या एकून ४२ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस दरराेज विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी साेडल्या जातात. मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने बस पाेहाेचण्यास उशीर हाेतो. बस आगारात आल्यानंतर तिची हमखास दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पुन्हा उशीर हाेते. त्यातच काही वेळेला साहित्य राहत नाही. परिणामी बस आगारातच उभी ठेवावी लागते. 

 

टॅग्स :state transportएसटी