शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावाच्या माेजणीमुळे अतिक्रमणधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे ...

आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी तलावाची मोजणी करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी तलावाच्या मोजणीला सुरुवात झाली. एकेकाळी आलापल्लीची शान समजल्या जाणाऱ्या मामा तलावात कालांतराने माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. अनेक लोकांनी अतिक्रमण करून तलावाच्या पोटात घर बांधकाम सुरू केले आहे, तर राजकीय वरदहस्तप्राप्त काहींनी चक्क तलावाच्या पोटात शेतीजमीनसुद्धा काढली. गावातील अनेक जागरूक नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. दुर्लक्षामुळे तलावाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत गेले. गुरुवारी तलावाच्या जागेची माेजणी करताना अतिक्रमणधारकांचा विराेध हाेऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल तसेच भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाेलाविले हाेते. भूमी अभिलेख विभागाकडून उपअधीक्षक एन.जी. पठाण, भूकरमापक समय्या बोमानवार, विघेश मोरगू यांनी तलावाची मोजणी सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माेजणीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, संतोष अर्का, शंकर बोलूवार, भाग्यश्री बेझलवार, पुष्पा अलोणे, शारदा कडते, अनुसया सोप्पीडवार, सुगंधा मडावी, सुमन खोब्रागडे, बेबीताई आत्राम आदी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गड्डमवार, ग्रामसेविका संध्या गेडाम, तलाठी रवी मेश्राम, ज्येष्ठ नागरिक सुकरू कोरेत, संतोष तोडसाम, व्येंकटी सल्लम, पराग पांढरे, जुलेख शेख, दौलत कोरेत, किशोर सडमेक आदी उपस्थित होते.

६५ एकराचा तलाव बनला बाेडी

आलापल्ली येथील तलाव मूळ २६.३ हेक्टर म्हणजेच जवळपास ६५ एकरामध्ये विस्तारला आहे. या विशालकाय तलावाला आज बोडीचे रूप प्राप्त झाले आहे. सध्या जेमतेम २० एकर जागेत तलाव शिल्लक आहे. अतिक्रमण वाढत गेल्यास संपूर्ण तलाव गिळंकृत केला जाण्याची शक्यता आहे. हा धाेका ओळखून अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर तलावाचे खाेलीकरण, तसेच साैंदर्यीकरण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असा मानस सरपंच शंकर आत्राम यांनी ‘लाेकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला. तलावाचे खाेलीकरण झाल्यास जल साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल, अशी नागरिकांना आशा आहे.