संतांचे विचार आत्मसात करा
By Admin | Updated: February 16, 2015 01:21 IST2015-02-16T01:21:48+5:302015-02-16T01:21:48+5:30
प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास ...

संतांचे विचार आत्मसात करा
आरमोरी : प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास मानसिकदृष्ट्या खचलेल्या समाजाला नवसंजीवनी मिळेल. सामाजिक क्षेत्रात विविध कार्यांमध्ये यश मिळविण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे यांनी केले.
आरमोरी येथे श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज प्रबोधन मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड तर प्रमुख अतिथी म्हणून संपादक मदन नागापुरे, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, प्राचार्य पी. आर. आकरे, तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नायब तहसीलदार दामाजी नैताम, महाकाळेकर, सुरेश रेवतकर, भास्कर बोडणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सांभाशीव अवचट, श्रीहरी जुवारे, कालुजी लाकडे, मधुकर गिरडकर, केशव बावनकर, जगन्नाथ पारधी, पंढरी जुवारे, मोतीराम सोनटक्के, अर्जुन घाटुरकर आदी तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच समाजातील प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बावनकर, संचालन प्रा. प्रदीप चापले यांनी केले तर आभार सी. टी. भरडकर यांनी मानले.
कार्यक्रमाला महासंघाचे कार्याध्यक्ष विवेक घाटुरकर, अध्यक्ष बुधाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव शंकर बावनकर, तुळशीराम चिलबुले, मिलिंद खोब्रागडे, विलास चिलबुले, प्रविण वैरागडे, विजय सुपारे, रविंद्र निंबेकार, नत्थू आकरे, पंकज मोंगरकार, आकाश चिलबुले, खुशाल नैताम, जयवंत घाटुरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)