कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एप्रिल महिन्यात
By Admin | Updated: February 11, 2015 01:58 IST2015-02-11T01:58:51+5:302015-02-11T01:58:51+5:30
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३ महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एप्रिल महिन्यात
गडचिरोली : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३ महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
राज्यभरात ३0५ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी १५३बाजार समित्याचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे तर उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकाही सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे पुढील सहा महिने या सहकारातील निवडणुकीची धामधूम सुरू राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका आघाडी शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत पुढे ढकलल्या होत्या त्यामुळे अनेक बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या मुदती संपल्यानंतरही आघाडी सरकारमुळे जादा कार्यकाळ मिळाला होता तर इच्छुकांमध्ये अगोदरच नाराजी पसरली होती. मात्र न्यायालयाच्या दणक्यानंतर आता या समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत पणन विभागाने संचालक दिनेश ओऊळकर यांनी बाजार समित्याचे निवडणुकांचे परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना त्या अन्वये कारवाई करण्याविषयी कळविले आहे.
याबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार कृषी सहकार संस्थावर संचालक मंडळ आहे.तसेच ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यांच्या निवडणूका घेण्याचे आदेश आहेत. राज्यातील १५३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यातील सुमारे १४0 बाजार समित्यावर प्रशासक आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)