शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

निर्बंध शिथिल झाल्याने एसटीच्या बसफेऱ्या सुरू, पण प्रवासी घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील फेऱ्या हाेताहेत प्रवाशांअभावी रद्द

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल झाले आहेत. अनेक व्यवहारही सुरू झाले. पण बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन दिवसात मोजकीच होती. त्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्याही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना कमी झाला असला तरी पूर्ण गेलेला नाही, हे लक्षात ठेवत लोक अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.जिल्ह्यात सध्या चंद्रपूर, नागपूर, अहेरी या मार्गावर सर्वात जास्त बसफेऱ्या आहेत. प्रवासी संख्या वाढेल तसतशा इतर मार्गावर बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. तोट्यात बसफेऱ्या चालविण्यास एसटीचे अधिकारी तयार नाहीत. परिणामी अनेक चालक-वाहकांना सध्या काम नाही.

ट्रॅव्हल्स बसेस बंदचनागपूर, चंद्रपूरसह काही प्रमुख मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्स बसेस माेठ्या प्रमाणावर चालतात. पण लाॅकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर अजून लाेक प्रवास करण्यास बाहेर पडत नसल्याने ट्रॅव्हल्सच्या बसेस अजुन सुरू झालेल्या नाहीत.

प्रशासनाने परवानगी दिली असली तरी एसटी बसेस चालवताना डिझेलचा खर्चही परवडला पाहिजे. लोकांना जसजसे समजेल तसतसे प्रवासी वाढली. त्यासोबत एसटीच्या फेऱ्याही वाढेल. - अशोक वाडिभस्मे, विभाग नियंत्रक

प्रवासासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणे

तीन महिन्यानंतर मी आता शहराबाहेर निघालो. चामोर्शीला घरगुती कार्यक्रमासाठी जात आहे. लांबच्या प्रवासाची मात्र अजून हिंमत होत नाही.काेराेनाची भिती अजून कायम आहे.- दिवाकर कोपुलवार

मी बँकेत अस्थायी कर्मचारी आहे. लॉकडाऊनमध्ये चामोर्शीवरून काही जण मिळून एकाच्या कारने येत होतो. आता एसटी सुरू झाल्याने प्रवासाची सोय झाली. त्यामुळे खर्चही वाचणार आहे.- स्वप्निल अहिलावार 

परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला आले होते. लॉकडाऊनमुळे आतापर्यंत गडचिरोलीत येणे शक्य झाले नाही. दर्शनी गावाला परत जाण्यासाठी दोन तासापासून गाडीची वाट पहात आहे.- आरती गिरी 

दिवाळीनंतर पहिल्यांदा माहेरी वडिलांच्या भेटीला आली होती. पण शेतीचा हंगाम सुरू झाल्याने दोनच दिवसात सासरी परत जावे लागत आहे. एसटी बस सुरू झाल्याने दाेन दिवसासाठी का असेना, ही भेट हाेऊ शकली.- शैला शरद मांदाळे

 

टॅग्स :state transportएसटी