काेराेना संचारबंदीमुळे कारल्यांची जावक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:43+5:302021-04-19T04:33:43+5:30
माेहटाेला-किन्हाळा परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेतात कारल्यांची लागवड केली. पिकाला बरा दर मिळाणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. परंतु काेराेना ...

काेराेना संचारबंदीमुळे कारल्यांची जावक घटली
माेहटाेला-किन्हाळा परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेतात कारल्यांची लागवड केली. पिकाला बरा दर मिळाणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरविली. काही व्यापारी अल्प दरात कारल्यांची खरेदी करीत आहेत. परंतु या किमतीत कारले विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. तोडाईचा खर्चदेखील निघून येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कारले सडण्याच्या मार्गावर आहेत.
माेहटाेला परिसरात अनेक शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करून कारल्यांचे उत्पादन घेतात. येथील कारल्यांची चव आणि प्रत उच्च प्रतीची असल्याने चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते.
सुरुवातीला मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने येथील कारल्यांना थेट शेतात ४२ रुपये प्रती किलो दर मिळू लागला होता. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बाहेरचे व्यापारी येथील कारले खरेदी अल्प दरात करीत आहेत.
बाॅक्स
संचारबंदीची सबब पुढे करून शेतकऱ्यांची लूट
देसाईगंज तालुक्यातील स्थानिक व्यापाऱ्यांनी कारल्यांच्या अल्प मागणीची व संचारबंदीची सबब पुढे करून ६ ते ७ रुपये प्रती किलो दराने मागणी केली. कारले पीक ऐन भरात असताना होत असलेली आवक पाहून दर पाडून खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. खरेदीदार मिळत नसल्याने शेतातील कारले तोडाई शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होऊ लागली आहे.
बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसत असतानाच खरेदीदारांनी कारले खरेदीकडे पाठ फिरवल्याने लागवड खर्चही भरून निघण्याची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
180421\18gad_3_18042021_30.jpg
===Caption===
ताेडणीच्या प्रतीक्षेत असलेले कारले.