शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:08 IST

काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते.

ठळक मुद्देकाेंढाळा-देसाईगंज मार्ग ग्रामीण भागातील मुलींना हाेतोय त्रास

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.

काेंढाळासह परिसरातील अनेक गावचे विद्यार्थी पायदळ ८ किमी देसाईगंज येथे ये-जा करीत आहेत. यात त्यांना एका दिवशी १६ किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे लवकर बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

दिवाळीपासून अनेक शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली; परंतु बसफेऱ्या बंद असल्याने अनेक विद्यार्थीशाळा व महाविद्यालयांत अद्यापही गेले नाहीत. दूरवर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची अडचण हाेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोंढाळावरून ८ किमी अंतरावर असलेल्या तालुकास्थळी अनेक विद्यार्थी पायदळ ये-जा करतात. अनेक जण खासगी वाहनाने प्रवास करतात. यासाठी त्यांना पैसे माेजावे लागतात; परंतु ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, असे विद्यार्थी पायदळ जातात. देसाईगंज तालुक्यातील ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी पायदळ देसाईगंज येथे शिक्षणासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसाेय थांबविण्यासाठी लवकर बसफेऱ्या सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

वन्यप्राण्यांपासून धाेका

काेंढाळा येथील सकाळपाहीचे विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत आहे. त्यानंतर सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. विशेष म्हणजे, तालुक्यात वन्यप्राण्यांपासून धाेका आहे. अशास्थितीत सकाळच्या सुमारास पायदळ चालणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक धाेका विद्यार्थिनींना आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीST Strikeएसटी संप