शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:08 IST

काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते.

ठळक मुद्देकाेंढाळा-देसाईगंज मार्ग ग्रामीण भागातील मुलींना हाेतोय त्रास

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.

काेंढाळासह परिसरातील अनेक गावचे विद्यार्थी पायदळ ८ किमी देसाईगंज येथे ये-जा करीत आहेत. यात त्यांना एका दिवशी १६ किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे लवकर बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

दिवाळीपासून अनेक शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली; परंतु बसफेऱ्या बंद असल्याने अनेक विद्यार्थीशाळा व महाविद्यालयांत अद्यापही गेले नाहीत. दूरवर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची अडचण हाेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोंढाळावरून ८ किमी अंतरावर असलेल्या तालुकास्थळी अनेक विद्यार्थी पायदळ ये-जा करतात. अनेक जण खासगी वाहनाने प्रवास करतात. यासाठी त्यांना पैसे माेजावे लागतात; परंतु ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, असे विद्यार्थी पायदळ जातात. देसाईगंज तालुक्यातील ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी पायदळ देसाईगंज येथे शिक्षणासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसाेय थांबविण्यासाठी लवकर बसफेऱ्या सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

वन्यप्राण्यांपासून धाेका

काेंढाळा येथील सकाळपाहीचे विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत आहे. त्यानंतर सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. विशेष म्हणजे, तालुक्यात वन्यप्राण्यांपासून धाेका आहे. अशास्थितीत सकाळच्या सुमारास पायदळ चालणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक धाेका विद्यार्थिनींना आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीST Strikeएसटी संप