शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

दारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:28 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्माण होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषध निर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील हे ध्येय्य समोर ठेवणे जास्त आवश्यक आहे.

ठळक मुद्देअभय बंग : मुंबईत लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्माण होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषध निर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील हे ध्येय्य समोर ठेवणे जास्त आवश्यक आहे. यासाठी सर्व औषध कंपन्यांनी अल्काहोल आणि तंबाखू या व्यवसायांना नाही म्हणत त्यांचा विरोध करावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून काम करणारे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना आॅर्गनायझेशन आॅफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स आॅफ इंडियाच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने ११ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे वार्षिक दिवस कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग आणि सर्चच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग, ओप्पीचे अध्यक्ष वैधिश, महासंचालक कंचना टीके यांच्यासह देशभरातील औषध कंपन्यांचे राष्ट्रीय प्रमुख उपस्थित होते.भारतात सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी दुर्गम भागातील लोकांपर्यंत औषधी पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी औषध कंपन्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. बंग यांनी यावेळी केले.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग