जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:24+5:302021-02-05T08:52:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव ...

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अहेरी येथे कार्यक्रमासाठी जिल्ह्यात आले असता, काॅंग्रेस व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात, गडचिराेली हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जाते. परंतु जिल्ह्यात ४२ टक्केच्यावर गैरआदिवासी आहेत. तरी सुद्धा ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी युवकांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात पाेलीस भरती करायची असल्यास ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, त्यानंतरच पदभरती करावी, ज्याप्रमाणे राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सुरू असतानाच त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवून पदभरती करण्याचा निर्णय शासनाने केला असला तरी राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षण कमी करण्यात आले आहे, त्या जिल्ह्यातील ओबीसी युवकांवर पाेलीस भरतीमध्ये माेठा अन्याय हाेणार आहे.
राज्यातील आठ जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९९७ पासून १९ टक्क्यावरून ६ ते ९ टक्क्यावर आणून ओबीसींच्या संविधानिक हक्काची पायमल्ली केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे गडचिराेलीसह राज्याच्या इतर जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करूनच राज्यभर पाेलीस भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत माेटघरे, नंदू वाईलकर, गाैरव येनप्रेड्डीवार यांनी दिला.