भूलथापांना बळी पडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:44 IST2018-01-11T00:43:49+5:302018-01-11T00:44:00+5:30

निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवून जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करू, महागाई कमी करू, असे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने अद्यापही ओबीसींचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

Do not fall prey to misunderstandings | भूलथापांना बळी पडू नका

भूलथापांना बळी पडू नका

ठळक मुद्देकासवीत कार्यक्रम : विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवून जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करू, महागाई कमी करू, असे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने अद्यापही ओबीसींचे आरक्षण पूर्ववत केले नाही. विद्यमान सरकारने शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे खोटे बोलणाºयांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
तालुक्यातील कासवी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यवान खोब्रागडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, किशोर वनमाळी हजर होते.
 

Web Title: Do not fall prey to misunderstandings