वैनगंगेवरील जिल्हाबंदी नाका नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:23+5:302021-05-05T04:59:23+5:30

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा ...

District ban on Waingange is called Naka | वैनगंगेवरील जिल्हाबंदी नाका नावालाच

वैनगंगेवरील जिल्हाबंदी नाका नावालाच

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करण्यावर प्रतिबंध घातल्यास विविध कारणांसाठी हाेणारी गर्दी कमी हाेण्याचे प्रमाण कमी हाेईल, या उद्देशाने जिल्हा सीमाबंदी घालण्यात आली आहे. गडचिराेली-मुल मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिराेली व चंद्रपूर पाेलिसांनी आपापल्या हद्दीत जिल्हाबंदी नाके बसविले आहेत. मात्र हे नाके केवळ नावापुरतेच असल्याचे ‘लाेकमत’ने साेमवारी दुपारी १.३० वाजता केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. नाक्यावर असलेले पाेलीस ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना ई-पास आहे काय, कुठे चालले, काय काम आहे एवढेच विचारत हाेते. एकाही वाहनधारकाकडे ई-पास नसतानाही त्यांना साेडले जात हाेते. ई-पासशिवाय ये-जा करू दिले जात आहे. याची माहिती नागरिक एकमेकांना सांगत असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. काही युवक तर ट्रीपल सीट बसून जात हाेते तरी त्यांच्यावर काेणतीही कारवाई करण्यात आली नाही. गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाेलिसांनी जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

बाॅक्स

नदीतून जीवघेणा प्रवास

पाेलिसांच्या भीतीने काही नागरिक मुख्य मार्गाने प्रवास न करता नदीमार्गे प्रवास करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या बाेरमाळा घाटावरून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महिला भाजीपाला, दही विकण्यासाठी येतात. जिल्हाबंदी असली किंवा नसली तरी त्यांच्यावर काेणताच परिणाम पडत नाही. नदीमार्गे प्रवास एखादे दिवशी धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागल्या गेली आहे. दाेन्ही बाजूला असलेल्या गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याची पातळी कुठून कमी आहे. याची माहिती आहे. ते त्याच मार्गाने ये-जा करतात.

बाॅक्स

छत्तीसगड राज्य सीमेवर नाकाच नाही

धानाेरा तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. धानाेरा-मुरूमगाव-सावरगाव हा मुख्य मार्ग पुढे छत्तीसगड राज्यातील मानपूर शहराला जाेडतो. सावरगावजवळ दाेन्ही राज्यांची सीमा आहे. मात्र या ठिकाणी काेणताही नाका नाही. त्यामुळे दाेन्ही राज्यातील नागरिकांची खुलेआम ये-जा करणे सुरू आहे.

बाॅक्स

इतरही नाक्यांवर ढिलाच कारभार

देसाईगंज, आरमाेरी, हरणघाट, घाटकुळ, आष्टी या ठिकाणी जिल्हाबंदी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणचा कारभार ढिलाच असल्याने नागरिक खुलेआम ये-जा करीत आहेत.

बाॅक्स

ई-पास काढण्याकडे पाठ

दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास केवळ अगदी जवळच्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार, वैद्यकीय कारण आदीच कारणांसाठी दिला जातो. मात्र नाक्यावरून खुलेआम प्रवेश दिला जात असल्याने नागरिक ई-पास काढत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: District ban on Waingange is called Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.