शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सिरोंचातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM

सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या हस्तक्षेपाची गरज : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तेलंगणा व महाराष्ट्र शासनाविषयी असंतोष खदखदत आहे. भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. ऐन काढणीदरम्यान शेतामध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे, तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहण करून मोबदला न देताच पाणी अडविण्यास सुरूवात केली आहे. वडधम, आयपेठा, पोचमपल्ली, तुमनूर माल, पेंटीपाका, मुंगापूर या गावांमधील जवळपास २३८.९२ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. यापैकी काही जमिनीची खरेदी झाली आहे. तर काही जमिनीची खरेदी अजूनपर्यंत झालेली नाही. आणखी १२ गावातील जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पण जमिनीची खरेदी प्रक्रिया आटोपण्याआधीच पाणी अडविले जात आहे. या धरणाचा लाभ तेलंगणाला होत आहे. बुडीत क्षेत्र मात्र सिरोंचा तालुक्याच्या वाट्याला आले आहे. या ठिकाणी बॅरेज बांधकामाला महाराष्ट्र शासनाने विरोध करणे आवश्यक होते. मात्र कोणताही विरोध न केल्याने तेलंगणा सरकारने धरण बांधले आहे. उन्हाळभर गेट बंदच राहिल्यास आणखी काही शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.शेतकरी करणार आंदोलनमेडीगड्डा बॅरेज महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या गोदावरी नदीवर बांधले आहे. त्यामुळे मेडीगड्डा धरणाचा प्रश्न आंतरराज्यीय बनला आहे. सिरोंचातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर तेलंगणा सरकारला काहीच सोयरसूतक नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने त्यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. विशेष करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून तेलंगणा सरकारवर दबाव वाढविणे आवश्यक आहे. मात्र हे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारची हिंमत वाढत चालली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती