शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

जलस्त्रोतांना घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवासी व दुर्गम भागात अशा प्रकारची स्थिती पहावयास मिळते.

ठळक मुद्देहातपंप व विहिरींजवळ डबकी : एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम गावातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता, शारीरिक अंतर कायम ठेवणे आवश्यक आहे. यासह जंतनाशकाची फवारणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. परंतु एटापल्ली तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नाल्यांअभावी अनेक हातपंप व विहिरींना घाणीचा विळखा असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे.शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवासी व दुर्गम भागात अशा प्रकारची स्थिती पहावयास मिळते. एटापल्ली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या हद्दीतील गावांमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये वर्षातून एकदाही नाल्यांतील गाळाचा उपसा केला जात नाही. परिसर स्वच्छ राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. हातपंप व विहिरींजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरली असते. तालुक्यातील जांबिया गावात पक्या नाल्यांचा अभाव असल्याने हातपंपाजवळ मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांमध्ये गावातील पाळीव डुकरे, गाई, बैल, म्हशी दिवसभर बसून असतात. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्याने डबक्यातील सांडपाणी हातपंप अथवा विहिरींमध्ये पाझरते. घाणीजवळील याच पाण्याचा वापर गावातील नागरिक पिण्याकरिता व वापरण्याकरिता भरतात. गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातही स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.ग्राम पंचायतींचे दुर्लक्षएटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे स्वच्छता व आरोग्याची ही समस्या सुटत नाही. तालुक्यातील अनेक गावे वाऱ्यावर आहेत. सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारीसुद्धा याबाबत लक्ष देण्यास तयार नाही. दुर्लक्षामुळे आरोग्य व स्वछतेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

टॅग्स :Waterपाणी