शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:49 IST

Gadchiroli : पस्तिशी ओलांडलेल्यांची प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाली फौज

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : विवाह सोहळा अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहात फक्त एका स्त्री आणि पुरुषाचा संबंध जोडला जात नाही, तर दोनपेक्षा अधिक कुटुंब जोडले जातात. असे जरी असले, तरी सध्याच्या काळात विवाह जुळवणे आणि तो टिकवणे तारेवरची कसरतच असते. विवाह जुळवताना अनेक अडचणी येतात. सध्या प्रत्येक गावांमध्ये पस्तिशी ओलांडलेल्या उपवरांची फौज दिसून येते.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुलामुलींचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्ते व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. संगणक आणि मोबाइलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले. या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलींचे रूपांतर प्रौढांत होत असल्याने बेरोजगारांचे व शेतकरी पुत्रांचे विवाह जुळणे ही सामाजिक समस्या बनली आहे.

सूचक केंद्रही झाले हतबलअनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करतात; मात्र तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही. वैद्यकीय दृष्टीने पाहता मुला-मुलींच्या वयाला संततीप्राप्तीसाठी ठराविक मर्यादा आहे. वय जसे वाढत जाईल तसतसी संततीप्राप्तीची प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. वधू-वर सूचक केंद्रांनाही विवाह जुळवताना अडचणी येत आहेत.

खोडेच खोडे• विवाह जमवताना आई- वडिलांव्यतिरिक्त नातलगांमधील अनेकांचा विचार घेतला जातो. ते सुद्धा अनेक चौकशा करून खोडा घालतात.

बेरोजगार, शेतकरी मुलांसमोर आव्हानलग्न जुळवताना मुलगा नोकरी करतो काय, त्याच्याकडे रोजगार आहे काय? की तो सरकारी नोकरी करतो, याची आवर्जून चौकशी केली जाते. मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव लागत नाही.• अनेक लग्नसंबंध जमवताना मुली-मुलांबरोबरच दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात. बेरोजगार युवा, तसेच शेतकरी मुलाला लग्न जुळवण्यासाठी कसरत करावी लागते.

युवक व युवतींचे लग्न उशिरा जुळते. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. भविष्यात मूलबाळ होण्यासाठी अडचणी येऊ शकतात किवा उशीर लागू शकतो. यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.डॉ. शीलू चिमूरकर, आरमोरी

 

टॅग्स :marriageलग्नGadchiroliगडचिरोली