शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:49 IST

Gadchiroli : पस्तिशी ओलांडलेल्यांची प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाली फौज

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : विवाह सोहळा अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहात फक्त एका स्त्री आणि पुरुषाचा संबंध जोडला जात नाही, तर दोनपेक्षा अधिक कुटुंब जोडले जातात. असे जरी असले, तरी सध्याच्या काळात विवाह जुळवणे आणि तो टिकवणे तारेवरची कसरतच असते. विवाह जुळवताना अनेक अडचणी येतात. सध्या प्रत्येक गावांमध्ये पस्तिशी ओलांडलेल्या उपवरांची फौज दिसून येते.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुलामुलींचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्ते व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. संगणक आणि मोबाइलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले. या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलींचे रूपांतर प्रौढांत होत असल्याने बेरोजगारांचे व शेतकरी पुत्रांचे विवाह जुळणे ही सामाजिक समस्या बनली आहे.

सूचक केंद्रही झाले हतबलअनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करतात; मात्र तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही. वैद्यकीय दृष्टीने पाहता मुला-मुलींच्या वयाला संततीप्राप्तीसाठी ठराविक मर्यादा आहे. वय जसे वाढत जाईल तसतसी संततीप्राप्तीची प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. वधू-वर सूचक केंद्रांनाही विवाह जुळवताना अडचणी येत आहेत.

खोडेच खोडे• विवाह जमवताना आई- वडिलांव्यतिरिक्त नातलगांमधील अनेकांचा विचार घेतला जातो. ते सुद्धा अनेक चौकशा करून खोडा घालतात.

बेरोजगार, शेतकरी मुलांसमोर आव्हानलग्न जुळवताना मुलगा नोकरी करतो काय, त्याच्याकडे रोजगार आहे काय? की तो सरकारी नोकरी करतो, याची आवर्जून चौकशी केली जाते. मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव लागत नाही.• अनेक लग्नसंबंध जमवताना मुली-मुलांबरोबरच दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात. बेरोजगार युवा, तसेच शेतकरी मुलाला लग्न जुळवण्यासाठी कसरत करावी लागते.

युवक व युवतींचे लग्न उशिरा जुळते. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. भविष्यात मूलबाळ होण्यासाठी अडचणी येऊ शकतात किवा उशीर लागू शकतो. यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.डॉ. शीलू चिमूरकर, आरमोरी

 

टॅग्स :marriageलग्नGadchiroliगडचिरोली