अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:48+5:302021-01-16T04:40:48+5:30

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ...

The Dhanora-Rangi-Vairagad road has been incomplete for two and a half years | अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच वर्षाचा कालावधी उलटून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे रहदारीस अडथळा येत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

धानाेरा-वैरागड मार्गाचे प्रत्यक्ष काम मे २०१८ सुरू करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या. यातच रस्ताच वाहून गेला. मार्च २०२० पासून करोना संसर्गामुळे सर्व ठप्प पडले. धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अशाही स्थितीत सोडे ते मोहली पर्यंत जून-जुलै २०२० मध्ये सुरू करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. परंतु काम झाले नाही. कठिण परिस्थितीत मोठी कसरत करुत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मोहली-रांगी-विहीरगाव या १८ कि.मी.मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील अडीच वर्षांपासून या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा-रांगी-वैरागड-ठाणेगाव या ४० कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. धानोराबाजूने काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या मार्गाचे लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाने दररोज जड वाहने ये-जा करतात. जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे, या मार्गावरील बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठिण झाले आहे. त्यांचे हाल हाेत आहेत. सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे भगदाड पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा लोकांना हाेती परंतु मागील वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सध्या या मार्गावर गिट्टी पसरवली असल्यामुळे नागरिकांना लोहारा ते रागी मार्गाने ये-जा करणे बंद झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून प्रशासनाने लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The Dhanora-Rangi-Vairagad road has been incomplete for two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.