दादासाहेबांचे कार्य चिरकाल टिकणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:34+5:302021-01-13T05:35:34+5:30
अहेरी : माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे कार्य चिरकाल टिकणारे व अविस्मरणीय असून प्रत्येकांनी त्यांचे विचार आत्मसात ...

दादासाहेबांचे कार्य चिरकाल टिकणारे
अहेरी : माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे कार्य चिरकाल टिकणारे व अविस्मरणीय असून प्रत्येकांनी त्यांचे विचार आत्मसात करून त्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
कापेवार-बेलदार समाजाच्या समाजमंदिरासमोरील येथील पटांगणावर १० जानेवारी रोजी मा.सा.कन्नमवार यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते झाले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अनिल बेझलवार, नायब तहसीलदार वनिता नेरलवार, ज्योस्ना सुधीर नेरळ, वंदना विवेक केळकर आदी उपस्थित होते. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा.सा.कन्नमवार, सामाजिक नेते स्व.शंकरराव बेझलवार, स्व.शंकरराव गज्जलवार यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, नजीकच्या आष्टी येथील मोठ्या पुलाचे शिल्पकार स्व. दादासाहेब कन्नमवार असून माझ्या बाल व तरुणपणी त्यांचे सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील कार्य जवळून बघितले असून कार्य वाख्याणाजाेगे असे सांगितले.
बेलदार-कापेवार समाजाच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा सत्कार करण्यात आले. सोबतच दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व जयंती समारोहात कला आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविक नगर सेवक अमोल मुक्कावार, संचालन सारिका गडपल्लीवार व सत्यनारायण बंडीवार यांनी केले. तर आभार उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी मानले.
===Photopath===
110121\11gad_2_11012021_30.jpg
===Caption===
सत्कार करताना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार करताना कापेवार, बेलदार समाज बांधव.